आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas Passed Away) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पंकज उधास यांना प्रसिद्ध गझल चिठ्ठी आयी है मधून ओळख मिळाली होती.
चिट्ठी आयी है’ गाणे ऐकून राज कपूर रडले
राजेंद्र कुमार आणि राज कपूर खूप चांगले मित्र होते. एके दिवशी त्यांनी राज कपूर यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. रात्रीच्या जेवणानंतर पंकज उधास यांच्या आवाजात त्यांनी ‘चिठ्ठी आयी है’ ही गझल ऐकवली आणि राचज कपूर रडले. या गझलमुळे पंकजला खूप प्रसिद्धी मिळेल आणि ही गझल त्यांच्यापेक्षा चांगली कोणीही गाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
ज्या चित्रपटाच्या गाण्याने लोकप्रियता मिळवली, त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता
गायनाच्या कलेतून पंकज यांना परदेशात खूप प्रसिद्धी मिळाली. यावेळी अभिनेता आणि निर्माते राजेंद्र कुमार यांनी त्यांची गाणी ऐकली आणि ते खूप प्रभावित झाले. पंकज यांनी गाणे आणि चित्रपटासाठी कॅमिओही करावा अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांचा सहाय्यक पंकजशी बोलला मात्र त्यांनी नकार दिला.राजेंद्र कुमार यांनी याचा आणि पंकजच्या वृत्तीचा भाऊ मनहरशी उल्लेख केला. मनहरने पंकजला हे सांगितल्यावर त्याला खूप वाईट वाटलं. त्यांनी राजेंद्र कुमारच्या सहाय्यकाला बोलावून बैठक निश्चित केली. या भेटीनंतर त्यांनी ‘नाम’ चित्रपटात काम केले आणि ‘चिठ्ठी आयी है’ या गझलला आवाज दिला. ही गझल त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गझलांपैकी एक आहे. ही गझल डेव्हिड धवन यांनी संपादित केली होती.
पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे कुटुंब राजकोटजवळील चरखाडी नावाच्या गावातील एका कसब्यात राहत होते. त्यांचे आजोबा जमीनदार आणि भावनगर संस्थानाचे दिवाणही होते. त्यांचे वडील केशुभाई उधास हे सरकारी कर्मचारी होते, त्यांना इसराज वाजवण्याची खूप आवड होती. त्यांची आई जितुबेन उधास यांना गाण्याची खूप आवड होती. यामुळेच पंकज उधास आणि त्यांच्या दोन्ही भावांचा संगीताकडे नेहमीच कल होता.
पंकज यांनी कधीच विचार केला नव्हता की ते गाण्यातून आपलं करियर करतील. त्या काळात भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू होते. यावेळी लता मंगेशकर यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे रिलीज झाले. पंकज यांना हे गाणं खूप आवडलं. त्यांनी हे गाणे कोणाच्याही मदतीशिवाय त्याच ताल आणि सुरात रचले.एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळाले की ते गाण्यात चांगले आहेत, त्यानंतर त्यांना शाळेच्या प्रार्थना संघाचे प्रमुख बनवण्यात आले. एकदा माता राणीची चौकी त्यांच्या कॉलनीत बसली होती. रात्री आरती-भजनानंतर तिथे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा. या दिवशी पंकज यांच्या शाळेतील शिक्षकांनी येऊन त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात गाण्याची विनंती केली.पंकज यांनी ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले. त्यांच्या गाण्याने तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनाही भरभरून दाद मिळाली. श्रोत्यांमधून एक माणूस उभा राहिला आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना 51 रुपये बक्षीस म्हणून दिले.
पंकज यांचे दोन्ही भाऊ मनहर आणि निर्जल उधास ही संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. या घटनेनंतर पालकांना वाटले की पंकजही आपल्या भावांप्रमाणे संगीत क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करू शकतो, त्यानंतर पालकांनी त्यांना राजकोटमधील संगीत अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला.
काम न मिळाल्याने दुखावले आणि ते परदेशात गेले
तिथे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पंकज अनेक मोठ्या स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचे. त्यांना आपल्या भावांप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करायचे होते. यासाठी त्यांना तब्बल 4 वर्षे संघर्ष करावा लागला. या काळात त्यांना कोणतेही मोठे काम मिळाले नाही. कामना या चित्रपटातील त्यांच्या एका गाण्याला त्यांनी आवाज दिला, पण तो चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. काम न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी परदेशात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.
‘

