भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मुलाने भाजपला घरचा आहेर दिलाय. पंतप्रधान मोदींसोबत वडिल माधव भंडारी यांचा फोटो ट्विट करत गेली ५० वर्षे पक्षनिष्ठा असलेले आणि राज्यात काही न मिळालेल्या नेत्यांपैकी एक असल्याची व्यक्त खंत केली आहे.
नेमके चिन्मयचे ट्विट काय?
चिन्मय भंडारी याने पोस्टमध्ये ती वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने माधव भंडारी यांनी 1975 ला जनसंघ जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर 1980 मध्ये भाजपची निर्मिती झाली. आता त्याला जवळपास 50 वर्ष झाल्याचे म्हटले आहे. या 50 वर्षांच्या काळात माधव भंडारी यांनी महाराष्ट्राच्या विविध संघटना बांधणीचे काम केले. हजारो लोकांना, शेकडो गावांना मदत केली आहे.
चिन्मय भंडारी म्हणाले की, आत्तापर्यंत 12 वेळा मी त्यांच्या नावाची चर्चा विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी होताना पहिली आहे, 12 वेळा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. नेतृत्वाला याचा जाब अथवा त्यावर भाष्य करण्याच्या परिस्थिती नाही. ना मला तसे काही करायचे आहे, कारण माझ्या वडिलांसारखा माझा देखील त्यांच्यावर विश्वास आहे.
चिन्मय भंडारी म्हणाले की, पण एक आशा आणि दुःख तर सारखं होतंच. त्यांनी कधीही जाहीरपणे आपली व्यथा मांडली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले तिला दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. त्यांनी पक्षाचे काम कधीच थांबवले नाही, त्यांची तब्येत बिघडली असताना देखील नाही, गेल्या वर्षी त्यांच्या जवळची व्यक्ती गमावली तेव्हाही नाही. याउलट, मी अनेक वेळा मंत्री किंवा खासदार राहिलेल्या लोकांना शुल्लक कारणावरून अन्यायाच रडगाणे गाताना बघितल आहे. माझ्या देखत बघितलेली त्यांची 30 वर्षांची कारकीर्द आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांना योग्य ते मिळेल अशी मी आशा करतो.
सत्तेच्या गैरवापराविरोधात माधव भंडारी यांनी भूमिका मांडली,सामान्य लोकांचे प्रश्न मांडले. 2014 मध्ये पक्षाचे सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना आणि ते प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यातील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, अनेक पुस्तकाचे लेखन केले, असे चिन्मय भंडारी याने म्हटले आहे.
ज्या पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्यभर काम केले त्याला दुखावण्याचे काम त्यांनी केले नाही.प्रकृती बरी नसताना आणि आयुष्यातील जोडीदार गमावल्यानंतरही पक्षासाठी काम करणं त्यांनी थांबवले नाही. मी काही लोक ज्यांना पक्षाने मंत्री केले, खासदार केले अशांना अन्याय झाल्याचं म्हणताना पाहिल्याचे चिन्मय भंडारी याने म्हटले आहे.