Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोदी- शहांनी राजकारण खराब केले -डॉ. कुमार सप्तर्षी /सिव्हील सोसायटी गप्प बसणार नाही: डॉ विश्वंभर चौधरी

Date:

गांधी भवन मधील लोकसंसद मध्ये परिवर्तनाचा निर्धार !

पुणे:

रविवारी गांधी भवन येथे झालेल्या लोकसंसद मध्ये परिवर्तनाचा निर्धार करण्यात आला! नागरीक,सिव्हील सोसायटी आता घरात बसणार नाही तर भाजपच्या विरोधात मतदान होईपर्यंत मैदानात खंबीरपणे काम करणार आहे, असे या लोक संसद मध्ये निक्षून सांगण्यात आले.युवक क्रांती दल,रिपब्लिक युवा मोर्चा,निर्भय बनो,पँथर आर्मी,स्वराज्य क्रांती सेना,संविधान प्रचारक चळवळ,सत्यशोधक बहुजन आघाडी,संविधानिक राष्ट्रवाद मंच आणि अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने लोकसंसद चे आयोजन करण्यात आले.

केंद्र सरकार भारतीय संसदेला धर्मसंसद बनविण्याचा प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपविरोधी पक्ष संघटनांनी रविवारी , दि.४ फेब्रुवारी रोजी ‘लोकसंसद’ हा कार्यक्रम आयोजित केला . त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.’लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी सच्चा भारतीय मतदारांचे जनआंदोलन ‘ या उद्देशाने लोकसंसद उपक्रम आयोजित करण्यात आला.

प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.सद्य स्थिती आणि भविष्याचा वेध,सत्ता परिवर्तनाची व्यूह रचना , मोदी सरकारची १० अपयशी वर्षे, भाजपचा खरा अजेंडा, सत्ता परिवर्तनाची रण नीती अशी अनेक सत्रे या लोक संसद मध्ये आयोजित करण्यात आली होती.

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कोथरूड येथील गांधी भवनात दुपारी एक ते सायंकाळी पाच या झाला . लोकसंसदेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे हे स्वागताध्यक्ष होते. डॉ.विश्वंभर चौधरी, डॉ अभिजित वैद्य,अभ्यासक चंद्रकांत झटाले, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शहा, धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे, ह भ प धर्मकिर्ती परभणीकर, युनूस तांबटकर अशा अनेक मान्यवरांनी भाषणे केली.

सभागृहात डॉ अभिजित वैद्य,डॉ. अच्युत गोडबोले, आनंद करंदीकर,डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठदिया, फिरोज मुल्ला,अभय छाजेड, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, उत्पल व. बा., रवींद्र धनक,अप्पा अनारसे, एम एस जाधव, इद्रिस कारी सुदर्शन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष राहुल डंबाळे यांनी लोकसंसदेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे, असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्यासाठी लोकसंसद हे जनआंदोलन आहे.नरेंद्र मोदींची लोकप्रियता, भाजपची ताकद गोबेल्स नीतीने तयार केली असून ती खोटी आहे, असे ते म्हणाले.

सिव्हील सोसायटी गप्प बसणार नाही: डॉ विश्वंभर चौधरी
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,’ इंडिया आघाडीची ताकद अजूनही चांगली आहे. भाजप आपली ताकद फुगवून सांगत आहे. भाजपचे दक्षिणेचे दार बंद झाले आहेत. पूर्वोत्तर भागात भाजप विरोधी वातावरण आहे.विरोधी पक्षाला हतबलता वाटली तर नागरिकांनी, सिव्हील सोसायटीने पुढे येवून या पक्षांना युद्धासाठी तयार केले पाहिजे. शेतकरी भाजपाच्या विरोधात गेले आहेत.आर्थिक धोरणांमुळे मोदी सरकार हरणार आहे.कितीही पळपुटे बाजीराव महाराष्ट्रात भाजपकडे गेले तरी इथे ४७ टक्के मते इंडीया आघाडी कडे आहेत. चंद्रकांत पाटील हे कोथरुड मधून निवडणुक जिंकणार नाहित, असे भाजपचे लोक बोलतात.देशात भाजपा आघाडी २५० पर्यंत आटपणार आहे. नंतर भाजप अंतर्गत मतभेद उफाळून येणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात १३ जागांच्या वर भाजपा जाणार नाही.उत्तरेची लादली जाणारी संस्कृती ठोकरून महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे.

अनैतिक कारभारी बदलणे हाही सत्याग्रह: डॉ. सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम केला आहे. बकासुराची भूक भागत नसते, त्या प्रमाणे हे रोज एक मुख्यमंत्री खात सुटले आहेत. मोदींनी, शहांनी सर्व राजकारण खराब करून टाकले आहे.लोकसभा निवडणुक होईपर्यंत अनेक अटक सत्रे होणार आहेत.इडी ला पैसै खाणारे भाजपवाले का दिसत नाहीत? ज्यांना निवडून दिले, ते काम करीत नसल्याने मतदारांनी निवडणुक हाती घ्यावी. अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे.

ह.भ.प.धर्मकिर्ती परभणीकर म्हणाले, ‘ भाजपच्या राज्यात सलोख्याचे प्रदेश उध्वस्त करणे चालू आहे. वारकरी परंपरेचे ब्राहमणीकरण करणे चालू आहे. वारकरी मुल्यांच्या विरोधात काम सुरू आहे. आम्हीं महाराष्ट्र हातातून जावू देणार नाही. दंगली करणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता जावू देणार नाही’.

बिशप थॉमस डाबरे म्हणाले, ‘ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा महाराष्ट्र आहे.धर्मा धर्मात असंतोष वाढीस लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अल्पसंख्य समुदायाला सुरक्षित वाटेल असे वातावरण देशात असले पाहिजे. कोणीही ईतर धर्मा विरोधात विधाने करता कामा नये. गरिबांची स्थिती सुधारली पाहिजे’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...