मोदी सरकार, “मराठी भाषा अभिजात दर्जा”चे कोट्यवधी’चे अनुदान कधी देणार..?

Date:

“मराठी भाषा व सांस्कृतिक धोरणा”ची केंद्र व राज्य सरकार कडून अक्षम्य अवहेलना..!
– वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची टिका ..

मुंबई -दि ७ मार्च २६
तत्कालीन काँग्रेस सरकारने २०१४ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे कारकिर्दीत ‘मराठी भाषेस अभिजात दर्जा देणे बाबत’ पाठवलेला प्रस्ताव ‘राज्यातील विधानसभा निवडणूकी’च्या तोंडावर मतांच्या अभिलाषेपोटी मंजूर केला खरा मात्र तब्बल १॥ वर्षे उलटूनही मराठी च्या संवर्धनासाठी ‘अभिजात दर्जा’चे देणे लागत असलेले ५०० कोटी मात्र अद्यापही केंद्र सरकार कडून देण्याची नियत नसल्याची टीका काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा अभिजात दर्जा मान्य करतांना एकप्रकारे मराठी भाषा स्वतंत्र निर्मित आहे, असे केंद्र सरकारने जाहीर करूनही, पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथील अ भा मराठी साहित्य संम्मेलनाच्या उद्घाटन भाषणात मात्र मराठी (स्वतंत्र नसून) संस्कृत भाषेतून निर्माण झाली (?) आहे असे द्वयार्थी विधान केले, म्हणजे एक प्रकारे मराठी भाषा अभिजात नाही, असेच यातून सुचवायचे होते काय..? असा सवाल ही काँग्रेस’नै केला.
अभिजात दर्जा जाहीर झाला तरी, स्वतंत्र उत्कृष्ट अध्ययन केंद्र (Centre of Excellence) स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे अद्याप पडून आहे.
कोणतीही भाषा अभिजात घोषित झाली तर केन्द्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय त्या भाषेच्या संवर्धन, विकास आणि अभ्यासासाठी भरीव अनुदान देते, मात्र अभिजात मराठी साठी अद्याप अनुदान दिले नसल्याची वास्तवता आहे.
तसेच.. महायुती सरकारने २०२४ साली (निवडणूकीपुर्वी) स्वतःचे सांस्कृतिक धोरण घोषित केले. त्यात ऐतिहासिक संपत्ती आणि स्त्रोतांचे संरक्षण यापासून ते सांस्कृतिक विकासामध्ये वाढ अशी १७ उद्दिष्टे घोषित करून, त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल असे ही घोषीत केले होते.
तसेच संग्रहालये, नाट्यगृहे, ग्रंथालये यांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक करणे हे सांस्कृतिक धोरणाने मान्य केले होते, मात्र वास्तव हे आहे की तीच ग्रंथालये शासनाच्या उदासीनतेमुळे बंद पडत असून, ‘साहित्य संस्कृती’ने शेवटची घटिका मोजणे सुरु केले आहे.
नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्येही या ध्येयधोरणाच्या पूर्तीसाठी कसलीही तरतूद केलेली नसल्याची प्रखर टिका ही काँग्रेस ने केली.
महाराष्ट्रात, असंख्य नाट्यगृहांची अवस्था शोचनीय असून स्वच्छताग्रुहे, आसने, रंगमंचाची अवस्था ही बिकट आहे. कॉंग्रेसकाळातील धोरणच् आज कसेबसे राबवले जात असुन त्यास आधुनिक काळातील कसलाही स्पर्श दिला गेलेला नाही.
मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत असतानाही त्या कशा सुरु राहतील वा कशा वाढतील या दिशेने प्रत्यक्ष कोणतेही पाउल उचललेले नाही.
काँग्रेस प्रवक्ते पुढे म्हणाले की, या सरकारला मुळात सांस्कृतिक धोरण नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि ती खरेच अभिजात आहे हे सिद्ध करण्यासाठीची ईच्छा शक्ती नाही. सांस्कृतिक धोरण आणि त्यावरील तरतुदी मराठी संस्कृतीचा अपमान करणारी आहेत अशी प्रखर टिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या विषयी प्रसिद्धीस दिलेल्या प्रकटनात केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी

पुणे- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भवानी पेठ येथील काशिवाडी...

‘सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा' जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे...

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीदरम्यान आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा जिओहॉटस्टारवर नवा जागतिक स्ट्रीमिंग विक्रम

*     जिओहॉटस्टारवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला एकाच वेळी 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची पसंती  *     दुसरा उपांत्य फेरी सामना हा जागतिक स्तरावर सर्वाधिक स्ट्रीम केला गेलेला लाइव्ह कार्यक्रम आहे *     डिजिटल प्लॅटफॉर्मवर 619 दशलक्ष व्ह्यूजची नोंद - टी20 साठी आतापर्यंतचे सर्वाधिक व्ह्यूज दुबई / मुंबई, 7 मार्च 2026: क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि स्ट्रीमिंगच्या जगात आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 जागतिक स्तरावर नवनवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. 5 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यातील डिजिटल प्रेक्षकांच्या संख्येने एक ऐतिहासिक जागतिक टप्पा गाठला आहे. भारतातील आघाडीचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारने या महत्त्वाचा सामन्यादरम्यान अभूतपूर्व 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची नोंद केली. जगातील कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह इव्हेंटसाठी आतापर्यंत मिळालेली ही सर्वोच्च प्रेक्षक संख्या आहे. या सामन्याला जिओहॉटस्टारवर 619 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक स्ट्रीम केलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून 499 धावा झाल्या. या रोमांचक सामन्याने भारत आणि परदेशातील चाहत्यांची मने जिंकली. मुंबईतील या महत्त्वाच्या सामन्याने नोव्हेंबर 2024 मधील एका आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने स्थापित केलेल्या 65 दशलक्षांच्या आधीच्या जागतिक विक्रमाला मागे टाकले. वास्तविक,  वेगवेगळ्या मार्केटमधील एकत्रित प्रेक्षकसंख्येद्वारे हा आकडा साध्य झाला आहे. तर, दुसरीकडे जिओहॉटस्टारने केलेला हा विक्रम पूर्णपणे एकाच कार्यक्रमाचा होता. यामुळे थेट स्ट्रीमिंगमधील त्यांचे स्थान ठळकपणे स्पष्ट झाले आहे. तसेच लाइव्ह कार्यक्रमाचा आनंद देताना मोठ्या प्रमाणावरील मागणी हाताळण्याची त्याची क्षमता देखील सिद्ध करतो. हा विक्रम भारतीय संघाची लोकप्रियता, उपांत्य फेरी जिंकलीच पाहिजे, ही भावना आणि मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेम या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे आयसीसीच्या या स्पर्धेची लोकप्रियता सिद्ध होते. लिनियर टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर, उपांत्य फेरी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 320 दशलक्षांपेक्षा जास्त होती. तर स्क्रीन पाहण्याचा वेळ हा आश्चर्यकारकरित्या 23 अब्ज मिनिटांपेक्षा जास्त होता. यामुळेच तो आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले: "आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना एकत्र आलेले पाहणे खूप आनंददायी आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय संख्येवरून केवळ क्रिकेट चाहत्यांचा उत्साहच दिसून येत नाही, तर हा खेळ सर्वांसाठीच सहज उपलब्ध आणि आकर्षक बनवण्यात झालेली प्रगती देखील दिसून येते. हा विश्वचषक जेवढा मैदानावरील खेळासाठी लक्षात राहील तितकाच तो खेळाची भावना साजरी करण्यासाठी एकत्र आलेल्या लाखो चाहत्यांमुळेही लक्षात राहील."  जिओस्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर म्हणाले: “हे जसे जिओस्टारच्या तांत्रिक आणि सर्जनशील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. तसेच ते क्रिकेटला आणखी मोठे बनवण्याच्या आयसीसीच्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे. दर तीनपैकी एका भारतीयाने गुरुवारी झालेला दुसरा उपांत्य सामना पाहिला. आणि जेव्हा लाखो लोक अशा पद्धतीने सामना पाहतात तेव्हा तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करावा लागतो. मनोरंजनाचे भविष्य असेच असेल.” दोन्ही संघांच्या आकर्षक खेळाच्या पार्श्वभूमीवर, सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 619 दशलक्ष व्ह्यूजने 2024च्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 533 दशलक्ष व्ह्यूजच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अंतिम सामना अजून खेळला जाणे बाकी असताना, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026ने डिजिटल आणि ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर आधीच अनेक बेंचमार्क स्थापित केले आहेत. आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळवला जाणार आहे. या संपूर्ण सामन्याचा आनंद प्रेक्षक जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे थेट घेऊ शकतात.

धायरी येथील बेनकरवस्ती रस्त्याचे काम रखडले,अपघात, प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल

पालिकेचा गलथान कारभार पुणे:धायरी येथील सर्वात दाट लोकवस्तीच्या बेनकरवस्ती मुख्य...