ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर भव्य मोर्चा
पुणे —- सातशेचे बिल सत्तर हजार ,सौर ऊर्जेचा महावितरणने केलाय घात | पीएम सूर्यघर योजना आता अंधारात,चालणार नाही ,चालणार नाही महावितरणची हुकुमशाही चालणार नाही अशा घोषणा देत पुण्यातील ग्राहक व सौर ऊर्जा च्या सामाजिक संस्थांनी वाढीव वीजबिल व पीएम सूर्यघर योजनेला महावितरणने लावलेल्या जाचक अटीच्या निषेधार्थ आज महावितरनच्या मुख्य कार्यालावर भव्य मोर्चा काढण्यात आला .
या मोर्चाची सुरुवात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आली तेथून पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पुणे कॅम्प व परिसरातून मोर्चा रास्ता पेठ येथील महावितरणच्या मुख्यालयावर धडकला.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या
१) महावितरण च्या नवीन जाचक नियमांचा निषेध
२)सौर ऊर्जा क्षमतेवर निर्बंध आणि PM सुर्यघर योजनेवर परिणाम
३)ग्राहक आणि उद्योगांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी
४) वाढीव व चुकीची बिले अशा अनेक मागण्याचे निवेदन यावेळी महावितरणच्या मुख्य अभियंता यांना देण्यात आले .
आमच्या मागण्या या आठ दिवसात मान्य न झाल्यास मुंबई येथे विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मुकुंद कमलाकर व मनोज पाटील यांच्या वतीने देण्यात आला .
नागरिक, व्यापारी, उद्योग संघटना ,महिला,युवक व पर्यावरण संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या मोर्चाचे आयोजन पुणे शहर ग्राहक परिषद व ऑल इंडिया रिन्युबल एनर्जी (AIREA)
अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते .

