ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा अहवाल मागविणार की धडाकेबाज निर्णय घेणार ?
पुणे- गेल्या 10 वर्षा पेक्षा अधिक काळापासून मुंबई महापालिका 500 चोरस फुटापर्यंत च्या घरांना मिळकत कर माफी देऊन त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा कर आकरत नाही.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासकीय काळाच्या अगोदरील सत्रात देखील कॉँग्रेस ने सत्ताधारी भाजपकडे पुण्यातही 500 चौरस फुट घराला मिळकत कर माफी द्यावी असा आग्रह धरला होता.
आता आज होणाऱ्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत कॉँग्रेसचे गटनेते चंदू शेठ कदम यांनी हा प्रस्ताव दिला आहे. पहा नेमके के म्हटले आहे या प्रस्तावात जसेच्या तसे..
पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मिळकत धारकांकडून मिळकत कर घेण्यात येतो. ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्याबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे.पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ पाहता भविष्यात निवासी,बिगर निवासी,मोबाईल टोवर अशा मिळकतीमधून करोडोंचा महसूल मनपास मिळणार आहे. तसेच पुणे शहरात कर आकारणी न केलेल्या हजारो मिळकती असून अशा मिळकतीना कर आकारणी करणे आवश्यक आहे.
५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकती या गोरगरीब नागरिकांच्या असतात, सध्याची महागाई व बेरोजगारी लक्षात घेता नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा.
आता यावर स्थायी समिति अध्यक्ष श्रीनाथ भिमाले मुळातच कित्येक वर्षांपासून या विषयाला अनुकूल असल्याचे दिसून आलेले आहे. त्यांची ही अशी मिळकत कर माफी देण्याची ई छ्या वेळोवेळी दिसून आलेली आहे. मात्र महापालिकेच्या तिजोरीचा भार सांभाळताना आशा प्रस्तावावर नेहमी प्रशासनाचा अहवाल घेण्यात येतो. आणि तो आर्थिक दृष्ट्या महापालिकेला किती पेलवणार की ना ही ? याबाबतचा विचार करून प्रस्ताव संमत केले जातात किंवा तसेच प्रलंबित ठेवले जातात.पण हा प्रस्ताव संमत झाला तर तो ऐतिहासिक ठरेल आणि भिमाले यांच्या कारकीर्दीतील प्रस्ताव म्हणून स्मरणीय ठरेल.आता भिमाले हे व्यावहारिकेतून मार्ग काढून यावर नेमका के निर्णय घेणार ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

