Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोदींचे भाषण राम-रामने सुरू, जय सियारामवर संपले,म्हणाले,कालचक्र बदललं आहे…

Date:

पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम टाकेल, असे कार्य आता करायचे आहे

अयोध्येत रविवारी श्री रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख यजमान म्हणून मोदी सोनेरी रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान करून 12 वाजता मंदिर परिसरात पोहोचले. त्यांच्या हातात एक थाळी होती, ज्यात श्री रामलल्लाचे चांदीचे छत्र होते. संकल्पासह दुपारी 12.05 वाजता प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला, जो तासाभराहून अधिक काळ सुरू होता.

पंतप्रधानांनी देवाची आरती करून चंवर डुलवले केला. मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्याकडून कलावा बांधून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. यानंतर त्यांनी श्री रामलल्लाला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला. रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या चरणांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी 11 दिवसांचा उपवासही सोडला.

प्राण प्रतिष्ठेनंतर पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केले. पंतप्रधानांचे 35 मिनिटांचे भाषण राम-रामने सुरू झाले आणि जय सियारामने संपले. त्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आणि म्हटले – हे राम मंदिर भारताचा उदय पाहणार आहे. 

 या भव्य सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणामधील पात्रांचा उल्लेख करत देशातील युवकांना आवाहन केले. श्री रामाचे भव्य मंदिर तर तयार झाले, आता पुढे काय? आज या पवित्र वेळी आपण पुढील हजार वर्षांची पायाभरणी केली आहे. मोदींनी आपल्या भाषणात शबरी, निषादराज, खार आणि जटायू यांची उदाहरणे दिली.मोदींनी श्री रामाचे भव्य मंदिर तर झाले आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित करत एक संकल्प मांडला. राम मंदिराच्या निर्मितीच्या पुढे जाऊन आपण एक समर्थ, भव्य आणि दिव्य भारत निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन मोदींनी केले. या शुभ दिनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ज्या दैवी शक्ती आणि आत्मे उपस्थित आहेत, त्या आपल्याला असेच निरोप देतील का? कदापी नाही. आज मी मनापासून अनुभवतोय की, कालचक्र बदलत आहे.हा एक संयोग आहे. कालचक्राने या मंदिर निर्मितीसाठी आपल्या पिढीची निवड केली आहे. त्यामुळेच मी म्हणतोय की, हीच वेळ आहे हीच योग्य वेळ आहे. श्री रामाचे विचार सोबत घेऊन, राष्ट्र निर्मिती करण्याची शपथ घेऊ यात.पंतप्रधान म्हणाले की, आजच्या युगाची मागणी आहे की आपण आपल्या विवेकाचा विस्तार केला पाहिजे. हनुमानजींची सेवा, गुण, समर्पण. हे असे गुण आहेत जे बाहेरून शोधावे लागत नाहीत. हे गुणच एक भव्य आणि दिव्य भारताचा आधार बनेल. ही दिव्य भारताची निर्मिती आहे. दुर्गम झोपडीत राहणारी आई शबरीची अनुभूती येते. ती खूप दिवसांपासून म्हणत होती की राम येणार. हा विश्वास प्रत्येक भारतीयात जन्माला येतो. ते म्हणाले की, हा देवापासून देश आणि रामापासून राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार आहे. आज देशात निराशेला थोडी जागाही नाही. जे स्वतःला सामान्य आणि लहान समजतात त्यांनी खारीचे योगदान लक्षात ठेवावे.पीएम मोदी म्हणाले की, लंकापती रावण अत्यंत शक्तिशाली आणि ज्ञानी होता. पण जटायू पहा, तो बलाढ्य रावणाशी लढला. तो रावणाचा पराभव करू शकणार नाही हे त्याला माहीत होते. पण तरीही त्याने त्याचा सामना केला. अहंकारातून उठून स्वतःचा विचार केला पाहिजे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपण सगळे इथपर्यंत पोहोचलो आहोत. आता आम्ही थांबणार नाही.ते म्हणाले की, मी देशातील तरुणांना आवाहन करू इच्छितो की अशी वेळ आणि योगायोग पुन्हा होणार नाही. आता आम्हाला चुकण्याची गरज नाही. परंपरा आणि आधुनिकता सोबत घेऊन पुढे जायचे आहे. हे भव्य राम मंदिर भव्य भारताच्या प्रगतीचे साक्षीदार असेल. सामूहिक प्रयत्नातून ध्येयाचा जन्म झाला तर वेळ लागणार नाही. रामललाच्या चरणी शरण जाऊन मी माझे बोलणे संपवतो. जय सियावर रामचंद्र ।

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...