Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची: नाना पटोले

Date:

मुंबई, दि. २१ जानेवारी
देशात मागील १० वर्षापासून अत्याचारी, जुलमी, हुकूमशाही पद्धतीने काम केले जात आहे. भाजपाचे सरकार हे जनतेच्या मुलभूत प्रश्नांनाही महत्व देत नाही. संविधानीक व्यवस्था मोडीत काढून मनमानी कारभार सुरु आहे. लोकशाही व संविधान पायदळी तुडवले जात आहे. देशासमोर आज मोठे आव्हान असून याचा मुकाबला करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक संस्थांची भूमिकाही महत्वाची आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे विविध सामाजिक संस्थांची एक बैठक पार पडली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत २० मार्च रोजी होत आहे. या यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सामाजीक संस्थांनी सर्व समाज घटकांशी संवाद साधून तयार केलेला जनतेच्या विकासाचा जाहिरनामा त्यांना सुपूर्द केला जाणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, विश्वास उटगी, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष तंवर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, पत्रकार भाग्यश्री पांडे, पत्रकार डॉ. सलीम खान आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, विविध समाज घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी जातनिहाय जनगणना महत्वाची आहे. परंतु केंद्रातील भाजपा सरकार जनगणनाच करत नाही. देशातील १४० कोटी लोकसंख्येपैकी ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जाते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतात. म्हणजे देशातील ८० कोटी जनता गरिब, पीडित व वंचित आहे. भाजपा सरकार जनतेला गुलाम बनवत आहे, म्हणूनच शिक्षणापासूनही वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे राज्य आहे, जेव्हा या विचाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा याच विचाराचे लोक संविधान व लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पुढे येतात. जनतेमध्ये भाजपा सरकारविरोधात प्रचंड संताप असून जनता निवडणुकीची वाट पहात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवण्याचे काम ही जनताच करेल, असेही नाना पटोले म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...