दावोसच्या १ दिवसाच्या दौऱ्यावर ४० कोटी खर्च केलाय
पिंपरी- चिंचवड -अलिबाबा ४० चोर प्रत्येक उद्योग गुजरातला पाठवीत आहेत ,२ पक्ष फोडले , १ परिवार फोडला पण जनतेला काय मिळाले ? हाताला काम अन हृदयात राम हेच तर आमचे हिंदुत्व आहे असे वक्तव्य येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. ते पुण्याच्या तळेगाव येथे स्वागत सभेत बोलत होते. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला डिवचलं.आदित्य ठाकरे हे आज मावळ, पिंपरी- चिंचवड आणि पुणे दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस च्या दौऱ्यावर जाताना काही मंडळी दलाल नेले होते, केवळ बर्फात जाऊन खेळायचे म्हणून एका दिवसाच्या या दौऱ्यावर ४० कोटी खर्च केले .असाही आरोप त्यांनी केला . दावोस ला ज्यांना भेटले ते त्यांना महारष्ट्रात येथेही भेटू शकत होते असे ते म्हणाले.
वेदांता फॉक्सकॉनसह 160 कंपन्या महाराष्ट्रात येणार होत्या. मात्र, त्याअगोदर कंपन्या परराज्यात पळवण्यात आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार गेला. लाखो तरुण हे बेरोजगार झाले आहेत. अस घडलं नसतं, काहींनी गद्दारी केली. ही गद्दारी म्हणजे देशाशी बेईमानी आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही. त्यांनी करार रद्द केला आहे. कारण तिथं कंपनी उभारण्यासाठी सात वर्षे लागणार होते. त्यामुळं त्यांनी देशातून हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे भले करण्याच्या नादात देशाचे नुकसान झाले आहे. मग, खरा देशद्रोही कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला जातो आहे. पुढे ते म्हणाले, २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे, असं ठाकरे म्हणाले.