पुणे- महायुतीत असलेले शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री हे महायुतीत एकमेकांना नेहमी समजून घेत आलेत आणि युती धर्म पाळत आलेत ते भाजपची बदनामी करणाऱ्या रविंद्र धंगेकर यांची लवकरच हकालपट्टी करतील असा दावा भाजपचे पदाधिकारी येथे करत आहेत .या साठी आज खुद्द्द धंगेकर यांनी केलेल्या ट्वीट चा हवाला देखील हे पदाधिकारी देऊ लागलेत
पुणे शहरातील भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचविण्यासाठी रविंद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. लवकरच कारवाई होईल. महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्या बद्दलचे एकनाथ शिंदे यांचे मत बदलले आहे तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धंगेकरांसाठी भाजपाशी दुरावा निर्माण करू नये, असा दबाव आणला आहे. धंगेकरांना संभाव्य कारवाईची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी सर्वप्रथम आपण, मग नंतर पक्ष, युती असे ट्वीट केले आहे.असे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रवींद्र धंगेकर यांनी दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देताना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केले आहे. पाडव्याचा दिवस हा नवसंकल्पाचा दिवस असतो, याकडे लक्ष वेधत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘पुणेकरधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला आहे. धंगेकर म्हणाले की, समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली, तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा. खरा कार्यकर्ता तोच असतो जो समाजातले चांगले-वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि आपल्या शहराला वाईट घटना घडण्यापासून वाचवतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज आपण सर्वजण जे काही आहोत ते ह्या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आहोत. त्यामुळे युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळा, असे आवाहन त्यांनी केले.
दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या ऑफरच्या किस्सावर बोलताना म्हटलंय की, बरं झालं हे महाराज त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये गेले नाही… नाहीतर आज जैन मंदिराची जागा चोरून 3 हजार कोटींचा घोटाळा म्हणून अजितदादांनी तर पहिल्याच दिवशी राजीनामा घेतला असता.

