पुणे :सदाशिव पेठ,नारायण पेठ, शनवार पेठ येथील नागरिक जेव्हा कोथरूड सारख्या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले तेव्हा कोथरूड हा शहरातील शांत, सुसंस्कृत तसेच वैचारिक आणि सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला.पण हेच कोथरूड आता टोळ्यांच्या गुन्हेगारी कृत्यांनी बदनाम होऊ लागले आहे. कोथरूड गुन्हेगारी टोळ्यांची नगरी बनली आहे.ज्या कोथरूडमध्ये एक केंद्रीय राज्यमंत्री, राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री,एक खासदार नेतृत्व करतात त्याच कोथरूडमध्ये राज्याला हादरवून टाकणारे गुन्हेगारी टोळ्यांचे आकडे समोर आलेत. पुण्यातील ७६ टोळ्यांपैकी ३६ टोळ्या या कोथरुडमधल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.निलेश घायवळ,गजा मारणे,गणेश मारणे,शरद मोहोळ,बंटी पवार अशा टोळ्यानी कोथरूड चे नाव खराब केले असून यातील काही जन तुरुंगात असले काही मयत असले तरी काही अद्यापही वावरत आहेत अस्तित्व राखून आहे या टोळ्यांच्या सदस्यांची संख्या तब्बल २२८ असल्याचे पोलीस रेकॉर्ड मध्ये नमूद आहे .
एकेकाळी पुण्यातली महात्मा फुले मंडई ही गुन्हेगारीचे विद्यापीठ म्हणून नावाजलेली होती या विद्यापीठात माळवदकर, बोडके, मिसाळ,रामपुरी यासारख्या टोळ्यांची पाळमुळं रुजलेली होती. उपनगरांबरोबर अनेक टोळ्या उदयाला आल्या. मात्र या टोळ्यांच्या कारवाया स्थानिक स्वरूपाच्या होत्या.पण महापालिकेच्या हद्दीत येणार म्हणून पुण्याच्या अवतीभवती असलेल्या गावांमधल्या जमिनींना सोन्याचा भाव आला आणि बिल्डर बनलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक मित्रांना गुन्हेगारीकडे वळवले.त्यातली महत्त्वाची नावे म्हणजे मोहोळ,मारणे,बोडके टोळी अशा टोळ्या कोथरूड आणि आसपासच्या परिसरामध्ये फोफावल्या. गजा मारणेचा कधीकाळी सहकारी असलेल्या निलेश घायवळ याने पुढे फुटून गेल्यानंतर स्वतःची टोळी सुरू केली. मात्र एवढं सगळं झालं तरी गेल्या चार-पाच वर्षापर्यंत पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांची संख्या ही स्थानिक आणि मर्यादित स्वरूपाची होती.आंदेकर, माळवदकर,रामपुरी हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील या सर्वांच्या पूर्वीचे जुने नाव.काही राजकारण्यांनी गुन्हेगारीला राजाश्रय दिला आणि या गुन्हेगारी टोळ्यांची धार कमी होत गेली पण त्याबरोबर नव्या टोळ्या उभ्या होत गेल्या.अर्थात त्यांनाही काही प्रमाणात राजाश्रय मिळत गेलाच.
खरे तर येरवडा हे शिक्षा गृह नाही तर सुधारगृह आहे असे सुरुवातीच्या काळात महासंचालका सारखे अधिकारी नेहमी सांगत पण नंतर उलटी गंगा वाहू लागली येरवडा हे गुन्हेगारीचे विद्यापीठ बनू लागले गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या आकर्षणाने गुन्हे करणाऱ्या अनेक तरुणांवर पोलिसांनी मकोकासारख्या कठोर कायद्याचा अवलंब केला. शेकडो तरुण गुन्हेगार येरवडा नावाच्या या विद्यापीठात गेले आणि बाहेर आले ते थेट गुन्हेगारी टोळ्या चालवायचं तयार करायचं प्रशिक्षण घेऊन…त्याचा परिणाम असा झाला आहे की शहराच्या उपनगरांमध्ये नव्याने जवळपास 80 टोळ्यांचा उदय झालाय आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या टोळ्यांचा आगार ठरलंय ते म्हणजे कोथरूड..आणि त्याच्या आसपासचा परिसर.पुण्यातील ७६ टोळ्यांपैकी सुमारे ३६ टोळ्या या कोथरूड आणि परिसरातल्या आहेत. त्यामुळे महात्मा फुले मंडई नंतर आता कोथरूड हे पुण्याच्या गुन्हेगारीच नवं आगर ठरतंय.
या यादीतून झोन-तीन म्हणजेच पुणे पोलिसांच्या प्रशासकीय हद्दीचा तिसरा प्रभाग ज्यात प्रामुख्याने कोथरूड चा समावेश होतो. तिथेच तब्बल 36 नव्या टोळ्या गेल्या पाच वर्षात उदयाला आल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच मात्र कोथरूड सारख्या उच्चभ्रू उपनगरात जिथे समाजातले अनेक नावजलेल्या व्यक्ती, कलेचे उपासक राहतात तिथे इतक्या मोठ्या संख्येने होणारा गुन्हेगारी टोळ्याचा उदय हा गंभीर विषय आहे.
मुख्य गँग-निलेश घायवळ
प्रमुख / म्होरक्या
निलेश बन्सीलाल घायवळ रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड पुणे ( जेल बाहेर)
एकूण सदस्य संख्या– ५१
मुख्य गँग-गजा मारणे
कोथरुड पुणे (जेलमध्ये ) प्रमुख / म्होरक्या-गजानन पंढरीनाथ मारणे वय- ५७ रा. हमराज चौक शास्त्रीनगर
एकूण सदस्य संख्या– ७७
गणेश मारणे( जेलमध्ये) प्रमुख / म्होरक्या-गणेश निवृत्ती मारणे रा. फ्लॅट नं.१५ सरगम सोसायटी गल्ली
एकूण सदस्य संख्या-४४
शरद मोहोळ-प्रमुख / म्होरक्या-शरद हिरामण मोहोळ रा. सुतारदरा (दि.०५/१/२०२४ रोजी खुन झाला)
महेश उर्फ बंटी प्रकाश पवार रा. तुकाईनगर वडगाव बुद्रुक सिंहगडरोड पुणे (जेलमध्ये )
एकूण सदस्य संख्या-२६

