पुणे – पुण्यातील माळवदकर गँग कधीच संपली,Dगँग ची सहायक समजली जाणारी रामपुरी गँगहि संपली,कलमाडींच्या काळात अनेक गुंडांना राजकीय आश्रय मिळाला आणि त्यांचे गुंडगिरीतून राजकीय पुनर्वसन झाले तेव्हा वत्सला आंदेकर महापौर झाल्यावर आंदेकर यांची टोळीही संपुष्टात आली असे वाटले तरीही अलीकडच्या वनराज आंदेकर याच्या खुनाने आंदेकर गँग हि अन्य कुठल्या गँगशी वॉर करताना आढळून आली नसली तरी त्यांच्या घरातील नातलगांच्या कलहातून आंदेकर गँग अजूनही तग धरून बसल्याचे निष्पन्न झाले त्यात टिपू पठाण टोळीने पुण्यात लहान वयातील मुलांना हत्यारे पुरविण्याचे काम सुरु केल्याचेही दिसून आले.वनराज ची हत्या,नंतर बदला म्हणून आयुष कोमकर या आंदेकर यांच्या नातवाची हत्या या दोन्ही प्रकरणात २० /२० हून अधिक जणांना पोलिसांनी तुरुंगात घातले आहे.आता या सर्व पार्श्वभूमीवर आंदेकर नावाचा सुपडा साफ करण्याचा विडा च जणू पोलीस आणि प्रशासनाने उचलल्याचे दिसत आहे.आंदेकर यांच्या घरावरील छाप्यात अवघ्या १ ते दीड कोटीचा ऐवज सापडला पण पुढील तपासात आंदेकर टोळीने चक्क २० कोटीची खंडणी वसूल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.त्याचबरोबर आंदेकर यांच्या कुटुंबात माजी लोकप्रतिनिधी जरी होते तरी त्यांची छायाचित्रे,नावे,असलेली फलके पाणपोई हे सारे काही उखडून या टोळीचा सुपडा साफ करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.अर्थात आता मूळापासून हो टोळी खरोखर या प्रयत्नांतून साफ होणार कि आणखी फोफावणार हे मात्र येणारा काळच सांगू शकणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मच्छि मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्याचे पोलीस सांगत आहेत.या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,शिवम आंदेकर,अभिषेक उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. बंडू आंदेकर याने व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 कोटींची खंडणी घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता इत्यंभूत तपास केला जात आहे.विशेष म्हणजे पुणे पोलिसांना हत्येच्या काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आंदेकर टोळीच्या आरोपींना पोलिसांनी रेकी करताना रंगेहातदेखील पकडलं होतं. पण बंडू आंदेकर हा स्वत:च्याच नातवाला संपवेल, अशी कल्पना पोलिसांना देखील नव्हती. त्यामुळे पोलीस देखील या घटनेने अवाक झाले. या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपासून बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे, पोलीस तपासातून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.
आंदेकर टोळीवर १२ वर्षापासून संघटीरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशस्त भस्मे यांनी कळविले आहे की, गणेश पेठ मच्छि मार्केट, पुणे येथील मासे व्यापाऱ्यांना धमकावून व दहशतीने मागील १२ वर्षांपासून संघटीतरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचेसह इतर ११ त्यात आंदेकर याच्या घरातील महिलेसह टोळी सदस्यांविरुध्द फरासखाना पोलीस ठाणे येथे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुरनं १८२/२०२५, भारतीय न्यायसंहिता कलम ३०८ (खंडणी), ३०८ (४) (जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी घेणे), १११ (संघटीतरीत्या गुन्हे करणे), ३(५) (सामाईक उद्देश) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे शहर पोलीस यांनी पुण्यातील टोळीयुध्दाविरुध्द केलेल्या सक्षम व कठोर कारवाईमुळे दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरीकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला असून, या कारवाईमुळे मनोबळ वाढल्याने एका तक्रारदारने गेल्या १२ वर्षापासून सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीचा दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावाने चालू असलेला खंडणी उकळण्याचा प्रकार उघड केलेला असून, त्याबाबत त्याने फरासखाना पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केलेली आहे. सदरबाबत वर नमुद प्रमाणे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर खंडणी प्रकरणात बंडूअण्णा आंदेकर टोळीने आजपर्यंत २० कोटीपेक्षा जास्तची रक्कम मासे व्यापाऱ्यांकडून व्यवसायाकरीता जागा व इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून उकळली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी अक्षरक्षः कर्जबाजरी झाले असून, बंडू आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास व दहशतीमुळे ते सर्व प्रकार निमुटपणे सहन करीत होते. परंतू अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुणे शहर पोलीसांनी संघटीत गुन्हेगारी टोळीविरुध्द आक्रमक व कठोर कारवाई सुरू केल्याने सामान्य नागरीकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला असून पुणे शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत पुणे शहर पोलीस प्रतिबध्द आहे. नागरीकांनी देखील कोणत्याही दहशतीला न घाबरता होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्हयांबाबत पोलीसांना माहिती द्यावी असे अवाहन करण्यात येत आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास अजित जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे, फरासखाना हे करीत आहेत.
पुणे शहरामध्ये असे आरोपी, त्यांची टोळी व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांविरुध्द जोपर्यंत अश्या टोळयांचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत अशीच कठोर कारवाई सुरू राहील.असे त्यांनी म्हटले आहे.

