Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ना हनी आहे ना ट्रॅप, नानांचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही-

Date:

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हनीट्रॅप संदर्भात केलेला आरोप धुडकावून लावला. ते म्हणाले, कालपासून हनीट्रॅपचा विषय सभागृहात येत आहे. यांनी कोणता हनीट्रॅप आणला? हे मला समजतच नाही. नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे… नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब… तुमच्याकडे तो असेल तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना… ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ एखादी घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतो की, आजी-माजी मंत्री. आता सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. इकडे आजी आहेत, तिकडे माजी आहेत. हे आजी मंत्री आहेत की माजी मंत्री आहेत. कोण फसले आहे या हनीट्रॅपमध्ये?

कुठल्याही आजी-मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रारही नाही. पुरावेही नाहीत. अशी घटनाही समोर आलेली नाही. हनीट्रॅप नाहीच. पण अशी एक तक्रार नाशिकच्या संदर्भात आली होती. एका महिलेने तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागेही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. मला त्याचे राजकारण करायचे नाही. पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करत आहात. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याने निवडणूकही लढली आहे. हा पाहा पंजा, असे फडणवीस सभागृहात एक पोस्टर दाखवत म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले,
अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा असताना माझ्यासह आपल्या सर्वांच्या मनात वेदना आहेत. आपण अधिवेशन संपवतोय, पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडल्या आहेत, त्यातून नेमका काय संदेश आपण घेऊन जाणार आहोत? आणि लोकांना काय संदेश आपण देत आहोत? ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही. कुठल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही. ही विधानसभा महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांच्या मालकीची आहे. अशा विधानसभेत समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण या ठिकाणी विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथ्याबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असे वाटते की, आपण सर्वांनी याविषयी चिंतन करण्याची गरज आहे. मी आपले आभार मानेन की, आपण हे प्रकरण गांभिर्याने घेतले. दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते की नव्हते हे सोडले तर त्या दोघांनीही याठिकाणी खेद व्यक्त केला. पण मला असे वाटते की, शब्दांतून निघणारे विष हे एखाद्या नागाच्या विषाहूनही जास्त विषारी असते. त्यामुळे याठिकाणी चर्चा, चर्चेचा स्तर या प्रकरणी कटूता निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनेकदा प्रसंग येतात. शेवटी आपण माणूस आहोत. राग अनावर होतो. पण त्यानंतरही आपल्या चर्चेचा स्थायीभाव हा भाव मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे. आपण पाहिले कुणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कुणी अजून काही बोलत आहे, कुणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांविरोधातच अध्यक्ष मॅनेज आहेत असे बोलतंय. मला असे वाटते की, या सभागृहाने एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे. या सभागृहात 288 सदस्य आहेत. नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत. आपण 45 च्या ऐवजी 200 लक्षवेधी करता. त्यानंतरही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो. ती भाषा काही योग्य नाही. त्रिभाषा सूत्रावरही बरीच चर्चा झाली. आता कुठली भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेन. पण मला असे वाटते की, आपल्याला निवडून आल्यानंतर एक त्रिसुत्री या प्रकरणी ठरवावी लागेल. ती म्हणजे, संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन व सातत्यपूर्ण संवाद. ही त्रिसुत्री पाळली तर याठिकाणी निश्चितपणे आपण त्यातून एक चांगला संदेश देऊ शकतो.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, काल या ठिकाणी जी हाणामारी झाली. खरे म्हणजे कुणीही कुणाहीसोबत येत आहे या प्रकरणी काही ना काही शिस्त असली पाहिजे. आपण पाहिले तर ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत. नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर 8 गुन्हे आहेत. यांची पार्श्वभूमी एवढी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अशी मंडळी येथे येऊन मारामारी करतात. हे योग्य नाही. त्यामुळे सदस्यांनी यासंबंधी लक्ष आघेतले पाहिजे. अध्यक्षांनी या प्रकरणी घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आपण सदासर्वकाळ लोकांसाठी सभागृह बंद करू शकत नाही. काही लोकांनी चूक केली नाही म्हणून आपण तसे करू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की, आपण या सभागृहात खूप चांगले बदल केले आहेत. सभागृहाचा चेहरा आपण बदलला आहे. आता या सभागृहात पुढचे अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे. यादरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यंगत येऊ द्या विना बिल्ला इथे दिसणार नाही. कारण, असेही माझ्या लक्षात आले आहे की, अनेक लोक कुणाच्याही परवागीशिवाय आतमध्ये येतात. ते येतात कसे? 2-4 लोक आले तर आले त्याने मला फरक पडत नाही. त्याची चिंता वाटत नाही. पण त्यातील एखाद्याने इथे येऊन अतिरेकी घटना केली तर तर उद्याला त्याची जबाबदारी कोण घेईन? म्हणून येथील सुरक्षा व्यवस्थेत बदल करून आत येणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्रासोबतच प्रवेश दिला पाहिजे. व्यक्तीच्या गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले पाहिजे. हे झाल्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असे ते म्हणाले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण अनेक गोष्टींवर खेद व्यक्त केला आहे. पण ते करतील की नाही हे मला माहिती नाही. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटले, हस्तक म्हटले. त्यांच्याकडून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. याठिकाणी मी जे काही बोललो ते कोणत्याही एका पक्षाला लागू नाही. ते दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. कारण, आपण जसे वैयक्तिक आहोत, तशी एक संस्था म्हणूनही आपली एक इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो, तेव्हा सगळ्या आमदारांविषयीचे मत समाज तयार करतो असतो. तेव्हा तो सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षांचा आहे हे पाहत नाही. सर्वांबद्दल हे मत तयार होतो की, आपण कुठेही तरी सत्तेचा अपव्यवहार, अपव्यय करतोय. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...