Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

Date:

१२ जून २०२५ चा दिवस गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती. त्याची झळ दूरदूरपर्यंत पोहोचली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं.

प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा २४२ जणांना घेऊन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचेविमानाचा भीषण अपघात झाला. गुरुवारी (१२ जून) दुपारी ही घटना घडली.
अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेत लोकांचा तडफडून मृत्यू झाला. या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

एअर इंडियाचे AI171 हे विमान दिल्लीवरून आले होते आणि अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते.

विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच अहमदाबाद शहरातील मेघानीनगर भागात ते कोसळले. हे विमान कोसळले वैद्यकीय रुग्णालयाच्या वसतिगृहांच्या इमारतींवर!
ज्या भागात एअर इंडियाचे विमान कोसळले, ते मेघानीनगर विमानतळापासून १५ किमी दूर आहे. विमान कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावते. त्यानंतर विशिष्ट उंचीपर्यंत वर जाते. पण, त्यानंतर विमान हळूहळू खाली येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अधूंक दिसायला लागते. त्यावेळी ते जमिनीवर कोसळते आणि मोठा स्फोट होतो.अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते.

मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत

या विमान अपघातात विमानातील २४० जण मरण पावले आहेत. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे.

या घटनेबद्दल टाटा समूहाने दुःख व्यक्त केले आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

टाटा समूहाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जे जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च टाटा समूह करणार आहे. विमान अपघातात वसतिगृहाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याच्या उभारणीचा खर्चही टाटा समूह करणार आहे, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

विमानाची वैशिष्ट्ये:

बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर हे अमेरिकन कंपनी बोइंगचे अत्याधुनिक, लांब पल्ल्याचे मध्यम आकाराचे वाइड-बॉडी विमान आहे. हे ड्रीमलाइनर मालिकेतील सर्वात लहान मॉडेल असून, इंधन-कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. एअर इंडियाने या विमानाचा वापर युरोप, मध्य पूर्व आणि पूर्व आशियातील आंतरराष्ट्रीय मार्गांवर केला.

विमानाचे वय:

व्हीटी-एएनबी हे बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर २०१२ मध्ये तयार झाले आणि सप्टेंबर २०१२ मध्ये एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाले. यामुळे हे विमान सुमारे १३ वर्षे जुन्या होते.

प्रवासी क्षमता:

या विमानाची सामान्य कॉन्फिगरेशन २५६ प्रवाशांना सामावून घेते. यात १८ बिझनेस क्लास सीट्स (पूर्णपणे फ्लॅट-बेड) आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्स (अतिरिक्त लेगरूमसह) आहेत. या उड्डाणात २३० प्रवासी होते, जे विमानाच्या क्षमतेनुसार होते.

विमानाची वैशिष्ट्ये:

कार्बन कंपोझिट मटेरियलपासून बनलेले हे विमान हलके आणि २०% अधिक इंधन-कार्यक्षम आहे. यात मोठ्या खिडक्या, डिम होणारी इलेक्ट्रोक्रोमिक खिडक्या, सुधारित केबिन प्रेशर आणि कमी आवाजाची पातळी आहे. याची उड्डाण रेंज १३,६२० किमी आहे, ज्यामुळे अहमदाबाद-लंडनसारख्या लांब मार्गांसाठी ते योग्य आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...