सांगली-विधानसभा अध्यक्षांना आता निर्णय घ्यावा लागेल. कायद्याला धरून निर्णय घ्यावा लागणार आहे, सोडून निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार? हे पहावे लागेल. पक्षाआंतर्गत बंदी कायदा हा कायदा, कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल, त्यामुळे पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल. तर दुसरीकडे भाजपा विरोधात जास्त उमेदवार उभे करून मतांची विभागणी होईल, त्यामुळे भाजपची हीच रणनीती असेल.कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कदाचित एकत्र होतील,पण भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढतील अशी परिस्थिती देशात नाही,मात्र जर तिसऱ्यांंदा मोदी पंतप्रधान झाले तर देशाची घटना संपवून वेगळेच कायदे येण्याची भीती आहे असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. . ते आज सांगलीत बोलत होते.राम मंदिर ह भाजपचे नाही, मतदान हे महागाईच्या मुद्यांवर होणार आहे
राजीव गांधींनी मंदिराची कुलूप उघडली
देशातील सगळ्या संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्या फार काही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भाजपला मते दिली ती भाजपकडे जातील अशी स्थिती नाही. राम मंदिराचा वाद आहे, पण आम्ही त्याला विरोध करणार नाही, तसा प्रश्न पण येत नाही, राजीव गांधी यांनी मंदिराची कुलूप उघडली आहेत. मंदिर उभारले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. राम मंदिर हे भाजपचे नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
वंचितला इंडिया आघाडीत घेण्यास विरोध नाही
यावेळी बोलताना चव्हाण यांनी वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत विरोध नाही, वंचितने इंडिया आघाडीत यायला हवे, अशी भूमिका मांडली. विभाजन टाळण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. हे निवडणूकीचे वर्ष असल्याने निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

