भाजपने केंद्रात सत्ता मिळविण्यापूर्वी सोशल मिडिया वरून सोनिया गांधी यांच्यासह तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच अण्णा हजारे यांची प्रचंड मोठ्ठी बदनामी करत आणि अशीच मिक्स छायाचित्रे बनवून , ती व्हायरल केल्याचा काल सर्वांना आठवत असेल, कॉंग्रेस ने कधी ज्या बदनामीचा मुकाबला करण्याचाही प्रयत्न केला नाही . अशाच पद्धतीने मिडिया वॉर आता राहुल गांधीं विरोधात सुरु झाले आहे कि काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे ,भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये, राहुल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचे चेहरे एकत्र केले आहेत. यासोबतच दोघांची विचारधारा एकच असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी मालवीय यांनी या पोस्टरसह लिहिले- राहुल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदनही केले नाही. ते वारंवार विचारतात की आपण किती विमाने गमावली. पण, राहुल यांनी कधीही विचारले नाही की या युद्धात भारतीय सैन्याने किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा किती विमानतळ उद्ध्वस्त झाले.
यासोबतच, मालवीय यांनी राहुल यांना आजच्या काळातील मीर जाफर असे संबोधणारे आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे. खरंतर, मुघल सेनापती मीर जाफर हा इंग्रजांचा मित्र होता.
या पोस्टरमध्ये राहुल पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पाठीवर बसले आहेत. ते भारतीय सीमेकडे पाहत आहेत आणि विचारत आहेत की आपण किती विमाने गमावली? खाली शाहबाज म्हणतात, मोठ्याने विचारा.
राहुल सतत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्रास देत आहेत. ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे, ज्यामुळे हवाई दलाचे नुकसान झाले. यासोबतच परराष्ट्रमंत्र्यांचा एक व्हिडिओही शेअर केला जात आहे.
मीर जाफर कोण होता?
मीर जाफर हा एक मुघल सेनापती होता. जो भारतीय इतिहासात विश्वासघाताचे प्रतीक मानला जातो. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत तो इंग्रजांशी सामील झाला आणि नवाब सिराज-उद-दौलाचा विश्वासघात केला. मीर जाफरने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीशी एक गुप्त करार केला, ज्यामुळे सिराज-उद-दौलाचा पराभव झाला आणि भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया रचला गेला. नंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले.

