पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज सोमवार, 19 मे रोजी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’चे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्मारक येथून शंखनादन व हनुमान चालीसा पठाण करून या सिंदूर यात्रेची सुरुवात होऊन परत तिथेच समारोप सभा झाली.
मातालहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
लहान मोठ्या रणरागिणींकडून लाठीकाठी चे प्रदर्शन करण्यात आले,
महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा ताई फरांदे म्हणाल्या , ही सिंदूर यात्रा आपल्या मातृ शक्तीचा प्रतीक आहे ज्या भगिनींनी पहेलगाम हल्ल्यामध्ये आपले कुंकू गमावले आपल्या भारतीय सैन्यातील कुशल स्त्रीशक्तीने दुश्मनावर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले आहे त्यामुळेच आपली ही सिंदूर यात्रा तमाम स्त्री शक्ती साठी समर्पित आहे.
मेजर देशपांडे यांच्या प्रतिकात्मक संदेशात स्त्री शक्तीची महानता नमूद करण्यात आली. त्यांचे दोन्हीही पुत्र सैन्यात असून त्यांना त्याचा खूप अभिमान आहे.
या सिंदूर यात्रेत भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा अध्यक्ष सौ हर्षदाताई फरांदे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस प्रियांका शेंडगे शिंदे, गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, स्वाती मोहोळ यांच्या सह विविध संघटन
नांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते व पुणेकर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते