राहुल गांधींकडून सेनेचा अपमान वा सेनेवर अविश्वास कसा ? ते फडणवीसांनी सांगावे !पदा’ चे भान राखून जबाबदारीने बोला..! _काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

Date:

काँग्रेसची तिरंग्याप्रती आत्मियता स्वातंत्र्य लढ्यापासून… २००५ नंतरची नव्हे..!‘भारतीय सैन्या’ प्रती कृतज्ञता’ व श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचा फडणवीसां कडून राजकीय आखाडा..!

पुणे दि १९ –
नागपूर येथील ‘भारतीय सैन्याप्रती’ कृतज्ञता व गौरवपर निघालेल्या भाजपच्या ‘तिरंगा रॅलीच्या समारोप प्रसंगी ‘सैन्यातील शहीद जवानांना व हल्ल्यातील मृत नागरिकांना’ श्रद्धांजली वहाण्याच्या कार्यक्रमात बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली सभेचे संकेत व गांभीर्य पायदळी तुडवून त्यांचा राजकीय आखाडा केला व काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वर आधारहीन राजकीय आरोप करण्याचा निंद्य व दुर्दैवी प्रयत्न केल्याचा निषेध व्यक्त करून, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “विरोधी पक्ष नेते राहूलजी गांधी यांनी सेनेचा अपमान कश्या प्रकारे केला” ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी, आपण संविधानीक पदा’ चे भान राखून जबाबदारीने बोलावे नाहक आधारहीन, तथ्य – हीन, खोटे व बालीश आरोप करू नयेत व आपल्या मुख्यमंत्री पदाचे गांभीर्य जपावे असे ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
आपल्या ‘प्रसिद्धी निवेदनात’ ते म्हणाले की,
पहेलगाम हल्ल्या नंतर काँग्रेस कार्यकारिणी ची बैठक घेऊन, विरोधी पक्षासह केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची, देशाच्या ऐक्याप्रती निग्रहाची व सामंजस्याची भुमिका राहुल गांधी यांनी घेतली.
मात्र, ‘दहशतवादी केंद्रांवरील सेनेच्या हल्लयांची’ विदेश मंत्र्यांकडून… ‘पाकिस्तानाला पुर्व सुचना’ देणे हे कोणते नैतिक वा मुत्सद्दी शहाणपण आहे (?) याचा जाब स्वपक्षाच्या केंद्र सरकार’ला फडणवीसांनी अगोदर विचारावा व ही सरकार पुरस्कृत देशद्रोहाची कृती आहे काय (?) हे देखील तपासावे..!
देशाप्रती समर्पित ‘भारतीय सेनेच्या ‘ध्येयवादी जीवनाच्या करीअर’ला ४ वर्षांच्या अग्निवीर योजनेच्या ठेकेदारीत अडकवण्या विरोधात, काँग्रेसनेते राहूल गांधी यांच्या लढ्याचे श्रेय मनात बोचत असल्याने भाजप नेत्यांची राहुलजी विरोधात तथ्य वा आधारहीन टिका करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे.
२०१४ नंतरचा अनुभव लक्षात घेऊनच देशातील जनतेने काँग्रेस पक्षाची भुमिका, वाटचाल पाहून काँग्रेसच्या संसदेतील जागा दुप्पट वाढवून राहुलजी गांधी यांना संविधानीक ‘विरोधी पक्षनेते’ पदी बसवले याचे ऊचीत भान देखील भाजप नेत्यांनी ठेवावे.
काँग्रेस पक्षाची तिरंग्याप्रती आत्मियता स्वातंत्र्य लढ्यापासूनची आहे ती २००५ नंतरची नव्हे अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...