पुणे-पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजपने १२५ जागांवर लढण्याची तयारी चालविली आहे तर अन्य सुमारे ५० जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना सोडण्याची तयारी शर भाजपने दर्शविण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे भाजपने जाेरात तयारी सुरु केली आहे. पुन्हा एकदा भाजपचा महापाैर महानगरपालिकेत बसला पाहिजे. यादृष्टीने काम करा असे फडणवीस यांनी देखील सांगितले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले कि,’ सध्या भाजपचे पुण्यात १०५ नगरसेवक असून त्या १०५ जागा पुन्हा निवडून येणे ही पक्षाची प्राथमिक प्राधान्याने तयारी आहे. त्या संदर्भातील उमेदवारी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल. आता आम्ही भाजप पक्ष म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तिथे तयारी करण्यास लागणार आहे. महायुती म्हणून निवडणुक लढवायची असेल तर आम्ही आमचे मत जे असेल ते निश्चित मांडू पण त्याबाबतचा जागांचा फाॅर्म्युला हा प्रदेश स्तरावर ठरणार आहे,असे मत व्यक्त केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात गुरुवारी रात्री मुक्कामी असल्याने शुक्रवारी सकाळी त्यांना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी आमदार जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी भेट घेत आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.
याबाबत घाटे म्हणाले, काही नगरसेवक आमचे मागील निवडणुकीत कमी मतांनी पडलेले आहे. त्यामुळे जागांचे गणिताबाबत जागांची जुळवाजुळव आम्ही करत आहे. परंतु सन २०१७ च्या निवडणुकीत ज्या जागावर भाजप नगरसेवक विजयी झाल्या आहे त्या सर्व जागा आम्ही लढणारच आहे. मागील तीन वर्ष निवडणुक न झाल्याने आम्ही थांबलेलाे हाेताे. आता न्यायालयाने निर्णय दिल्याने आम्ही तयारीस लागलाे आहे. स्वबळावर निवडणुक की युतीत लढायचे आहे याबाबतचा निर्णय प्रदेश स्तरावर हाेणार असला तरी आम्ही आमची निवडणुक तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री यांनी काेणता कानमंत्र आम्हाला दिला नाही. त्यांनी काही सूचना दिल्या आहे त्यानुसार आम्ही आमचे काम सुरु केले आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा सांभाळल्या बद्दल त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री खालील पातळीवर चर्चा करुनच नंतर प्रदेश स्तरावर पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेतील. पुण्यात रविवारी दुपारी चार वाजता डेक्कन येथून फर्ग्युसन रस्त्यावर माेठी तिरंगा यात्रा आयाेजन केले आहे. यामध्ये पुण्यातील विविध मंडळे, संस्था, पक्ष व नागरिक यांनी सहभागी हाेण्याचे आवाहन केले आहे. भारत व पाकिस्तान मध्ये जे युध्द झाले त्यात भारतीय सैन्याने जी अतुलनीय कार्य केले त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही रॅली आहे.

