पुणे-‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या अभियानाच्या प्रारंभी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरंडवणे येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्या मंदिर येथे झालेल्या या अभियानाला कोथरूडकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या उपक्रमात पूर्णवेळ उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.
वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषय या संदर्भात नागरिकांनी भेटी घेतल्या. नागरिकांकडून आलेले प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करत तातडीने कामे मार्गी लावण्याच्या निर्देशही दिले.
‘आपले काम होईल’, या भावनेने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने निश्चितच या उपक्रमाचे समाधानही मोठे आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून थेट सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर नागरिकांचा येणारा प्रतिसादही निश्चितच तितकाच आनंद देतो असे मत केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार आपल्या समस्यांचे नक्की निराकरण करेल या विश्वासातूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक अशा अभियानात सहभागी होत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करून घेत आहेत असे मत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त के
यावेळी विविध शासकीय योजनांचे तसेच कागदपत्रे-दाखल्यांसंदर्भातील स्टॉलची उभारण्यात आले होते. महसूल, पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, माजीनगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात परंतु त्या सोडवायच्या कशा हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो.
या वेळी कोथरूड भागातील १५०० नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. सदर समस्यांचे निराकरण त्वरित करण्यात येणार असून त्यासाठी सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणांचे सहकार्य घेण्यात आले.जे प्रश्न तातडीने सोडवणे शक्य होते ते या अभियानात लगेच सोडवले जाऊन तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या.इतर प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून लवकरात लवकर त्यांचे निराकरण करावे यासाठी देखील संबंधित सर्व विभागांना व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या

