पुणे:काँग्रेसवर टिका करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, मोदी सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान . नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जाती आधारित माहितीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशात सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करणारा आणि प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी असे म्हटले आहे की,दशकानुदशके काँग्रेसने सत्तेत असताना या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर विरोधात असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला. मात्र आता, मोदी सरकारने टाकलेल्या निर्णायक पावलामुळे समाजातील सर्व स्तरांतील मागास, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळेल, त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल.

