गेवराई -कर्जबाजारी शेतकरी मुलाने राहत्या घरी पत्र्याच्याआडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यानंतर तासाभराने वृद्ध आईनेपुत्रवियोगाच्या धक्क्यातून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना वाहेगाव आम्ला (ता.गेवराई) गावात घडली.एकाच घरात एकाच वेळी मायलेकाच्या मृत्यू झाल्याने गावकरी हळहळले. अभिमान भागुजी खेत्रे (३५) व कौशल्याबाई भागुजी खेत्रे(७०)अशी मृत मायलेकाची नावे आहेत.
शेतकरी अभिमान खेत्रे (वय ३५)हे अल्पभूधारक होते. त्यांना एकएकर जमीन असल्याने शेतीवरकुटूंबाचा उदरनिर्वाह भागत नव्हता.त्यामुळे ते मोलमजुरीही करत होते.त्यांनी एक एकर जमिनीवर हिरापूर येथील स्टेट बँकेचे५० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. या शिवाय काहीखासगी कर्जही उचलले होते. शेतीसाठी घेतलेले कर्जकसे फेडणार या विवंचनेत असलेल्या अभिमान यांनीसोमवारी २८ रोजी सकाळी ६ वाजता राहत्या घरीगळफास घेवुन आत्महत्या केली. मुलाने गळफासघेतल्याचा धक्का त्याची आई कौशल्याबाई खेत्रे यांनाबसला. तासाभराने सकाळी ७ वाजता त्यांनीहीकिटकनाशक प्राशन केले. त्यांना बीड जिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
आई कौशल्याबाई खेत्रे यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार होता.मागील काही वर्षांपासून त्या अाजारी होत्या. औषधे घेण्यासाठी पैसेनसल्यामुळे मागील काही दिवसात त्यांनी औषधेही घेतली नव्हती. त्यामुळेत्यांच्या कुटुंबाला गावातील नागरिकांनी आर्थिक मदत दिली आहे. अभिमानयांची पत्नी दोन दिवसांपूर्वीच मुलांसह माहेरी गेली होती. घटना कळताच त्यापरत तातडीने सासरी आल्या.
अभिमान खेत्रे यांचे वडील भागुजीखेत्रे यांचे १० वर्षांपूर्वी आजारानेनिधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाचीसंपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती.आता कुटूंब उघड्यावर पडलेआहे. अभिमान याच्या पश्चातपत्नी, एक मुलगा, एक मुलगी,भाऊ, भावजई असा परिवार आहे.
अभिमान खेत्रे यांच्या पार्थिवारसोमवारी दुपारी २ वाजता गावातअंत्यसंस्कार झाले. तर कौशल्यबाई खेत्रे यांच्या पार्थिवावर मंगळवारीदुपारी २ वाजता अंत्यसंस्कार झाले.या घटनेमुळे हळहळ व्यक्त झाली.