मुंबई- -गुरुवारी मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात RSS संरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत विधान केले. ते म्हणाले की, देश शक्तिशाली आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे असे सांगितले. ही लढाई कोणत्याही समाजांमधली नाही तर धर्म आणि अर्धमाची आहे. काश्मीरमध्ये दहशतवादांच्या कृत्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे. ते म्हणाले, रावणाला मारण्याशिवाय रामाकडे पर्याय नव्हता.
काश्मीरमध्ये कट्टरपंथीयांनी जे केले त्याचा प्रत्येकजण निषेध करत आहे. भागवत यांनी त्यांच्या भाषणात एक उदाहरण दिले की रावण हा भगवान शिवाचा भक्त होता पण तो अशा काही कारवायांनी वेढला होता ज्यांचे स्पष्टीकरण देऊन निराकरण होऊ शकत नव्हते, म्हणून प्रभू रामचंद्रांना त्याचा वध करावा लागला.पुढे ते म्हणाले की, असे काही लोक आहेत, ज्यांना समजावून सांगून काहीही होणार नाही. त्यांना धडा शिकवला पाहिजे. मला आशा आहे की हे लवकरच साध्य होईल. पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मारले गेले, हिंदू असे कधीच करत नाहीत. असेही मोहन भागवत म्हणाले.
मोहन भागवत म्हणाले, शत्रुत्व आणि वैर हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणे हा देखील देखील आपला स्वभाव नाही. जर तुमच्याकडे शक्ती असेल तर तुम्ही ती दाखवली पाहिजे. अशा वेळी शक्ती दाखवली पाहिजे… हे जगाला संदेश देते की जो सत्तेचा सामना करतो तो बलवान असतो. हा लढा समुदायांमध्ये नाही तर चांगल्या आणि वाईटामध्ये आहे.
काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जे केले त्याचा सर्वजण निषेध करत आहेत. काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर मारण्यात आले. हिंदू हे कधीच करणार नाहीत. या घटनेने आम्हाला दुःख झाले आहे, असे भागवत म्हणाले.