नवी दिल्ली : पहलगाम आतंकी हल्ल्याबाबत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील माहिती आता समोर येऊ लागली आहे,या बैठकीत राहुल गांधी यांनी पहलगाम ला सुरक्षा व्यवस्था का नव्हती? काश्मीर मधील पर्यटन स्थळावरील पूर्वी असलेली सुरक्षा व्यवस्था आता कुठे गायब झाली असे प्रश्न करताच गृहमंत्री अमित शहा यांनी चूक झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, जर काहीच घडले नसते तर आपण इथे का बसलो असतो?
बहुतेक राजकीय पक्षांनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा आणि तेथे योग्य सुरक्षा तैनातीचा मुद्दा उपस्थित केला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे सुरक्षा कर्मचारी का नव्हते असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला..सर्वपक्षीय बैठक जवळपास दोन तास चालली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , राहुल गांधी, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय,सपाचे राम गोपाल यादव, आरजेडीचे प्रेम चंद गुप्ता, संजय सिंह, कृष्ण देव रायुलु , त्रिचि शिवा, श्रीकांत शिंदे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांनी तीन प्रमुख प्रश्न सरकारला केले. त्यात पहिला प्रश्न होता की हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे की नाही? सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे की नाही?
यावर सरकारने आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी सरकारची चूक झाली आहे. जर काही झालं नसतं तर आपण इथं एकत्र कशासाठी बसलो असतो असं सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी सैन्य किंवा सुरक्षा दल का नव्हतं असा ही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरकारने सांगितलं की दरवर्षी हा मार्ग जूनमध्ये खोलला जातो. ज्या वेळी अमरनाथ यात्रा असते. मात्र या वर्षी टूर ऑपरेटर्सने सरकारला कोणतीही माहिती न देता जून महिन्यात बुकिंग घेतली होती.
20 एप्रिलपासून पर्यटकांना इथं आणलं जात होते. शिवाय स्थानिक प्रशासनालाही याबाबत काही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करता आलं नाही.असं सरकारने स्पष्ट केलं आहे. जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होतेय त्यावेळी इथं जवान तैनात केले जातात.
त्याच बरोबर सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारन घेतला आहे. पण हे पाणी रोखण्याचे किंवा साठवण्याचे कोणतेही साधन नाही. अशा वेळी या स्थगितीचा काय फायदा असा प्रश्नही केला गेला. त्यावर सरकार कठोर पावलं उचलत आहे हा संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचं सरकारने सांगितलं.
“भारताने दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढावे यावर सर्वांचे एकमत झाले आहे. भारताने भूतकाळात दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई केली आहे आणि भविष्यातही करत राहील. आयबी, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. ती कशी घडली आणि कुठे चूक झाली.
दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत ते सरकारसोबत असल्याचे सर्व पक्षांनी सांगितले.सर्व राजकीय पक्षांनी हा संदेश दिला आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका सुरात म्हटले आहे की, सरकार कोणतेही पाऊल उचलेल, आम्ही त्याचे समर्थन करू. दहशतवाद विरोधी सर्व कृती आणि भविष्यात करायच्या सर्व कृतींसाठी सरकारसोबत एकता सर्वांनी व्यक्त केली.