नावे विचारून घातल्या गोळ्या,महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला

Date:

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहेदेवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पहलगाम : जम्मू-काश्मीरच्या अति-पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला झाला असून पुण्यातील कर्वेनगरमधील दोन कुटुंबातील पुरुषांना गोळ्या चाटून गेल्या आहेत, त्यामुळे ते जखमी झाल्याचे वृत्त आहे . गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे नातेवाईक प्रचंड काळजीत पडले असून आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.

आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील संतोष आणि कौस्तुभ यातील एकाच्या अंगाला गोळ्या लागल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. येथे देशाच्या विविध भागांतील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. आधी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी पळापळ सुरू केली. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.मृतांमध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईमधील पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही पर्यटक गुजरातमधील सूरतमधील आहेत. तर, उर्वरित पर्यटक हरियाणा आणि दिल्ली येथून आले होते, असे यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना शक्य तेवढी वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करीत ओमर अब्दुल्ला यांना याविषयी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, जगदाळे आणि गणबोटे कुटुंबावर हल्ला झाल्याची माहिती दिली.

टीआरएफ ही लष्कर-ए-तोयबाची संलग्न दहशतवादी संघटना असून गेल्या काही वर्षांत या संघटनेने अनेक नागरिकांवर आणि बाहेरून आलेल्या कामगारांवर हल्ले केले आहेत. धर्माच्या आधारे पर्यटकांवर थेट हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे आणि यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत.

  • मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला-पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख आणि दुःख व्यक्त केले आहे.
या हल्ल्याला “घृणास्पद” असे वर्णन करून, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करणे हे क्रूरता आणि अमानुषतेचे कृत्य आहे.”आमच्या पर्यटकांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे. या हल्ल्याचे गुन्हेगार प्राणी आहेत – अमानवी आणि तिरस्कारास पात्र आहेत. निषेधाचे कोणतेही शब्द पुरेसे नाहीत,” असे मुख्यमंत्री यांनी एका कडक शब्दात म्हटले आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली.मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि आरोग्यमंत्री सकिना इटू यांच्याशी बोलले आहेत, ज्या जखमींवर उपचार आणि व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
त्यांनी पुढे जाहीर केले की ते परिस्थितीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्यासाठी आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व शक्य ती मदत मिळावी यासाठी तात्काळ श्रीनगरला परतणार आहेत.”मी माझ्या सहकाऱ्याशी बोललो आहे
@sakinaitooआणि ती जखमींच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी रुग्णालयात गेली आहे. मी ताबडतोब श्रीनगरला परत जाईन,” असे ते म्हणाले.तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम पर्यटन रिसॉर्टमधील दुःखद घटनेबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवर बोलले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 पुण्यात 15 फेब्रुवारीला

पुणे: भारताच्या राइडिंग समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 चे उद्घाटन 15 फेब्रुवारी 2026 रोजी हॉटेल हयात पुणे येथे होणार आहे. भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक व्यासपीठ विंगमॅनएक्स, मोटरसायकलस्वारांसाठी समर्पित या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम केवळ आमंत्रित व्यक्तींसाठीच विशेष प्रवेश आहे. राइडर-नेतृत्वाखालील सन्मानासाठी राष्ट्रीय मापदंड ठरणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश भारतीय मोटरसायकलिंगची खरी ओळख ठरवणाऱ्या चिकाटी, शिस्त, जबाबदारी आणि समुदायभावना यांचा गौरव करणे हा आहे. भारतात प्रथमच राइडिंग परिसंस्थेला मुल्यवर्धित करणाऱ्या गुणांसाठी राइडर्स आणि राइडिंग समुदायांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जाणार आहे. एका राइडरच्या गरजेतून उगम पावलेले आणि वाढत्या समुदायाने घडवलेले विंगमॅनएक्स अवॉर्ड्स, देशभरातील मोटरसायकलिंग संस्कृतीला शांतपणे बळकट करणाऱ्या व्यक्ती आणि क्लब्सचा सन्मान करतात. या पुरस्कारांमध्ये एकूण 20 निवडक श्रेणी आहेत, ज्यात वैयक्तिक उत्कृष्टता आणि सामूहिक समुदाय प्रभाव या दोन्हींचा समावेश आहे. सुरक्षित राइडिंगचे नेतृत्व, लांब पल्ल्याचे राइडिंग, महिला राइडर्स आणि समुदाय-नेतृत्वाखालील उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या श्रेणी यात समाविष्ट असतील. यामध्ये गार्डियन राइडर अवॉर्ड, लाँग हॉल लेजेंड्स, शी राईड्स फ्री, क्लब ऑफ द इयर, सेफ्टी-फर्स्ट क्लब अशा श्रेणींचा समावेश आहे. या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना निलेश साने, सीईओ आणि संस्थापक, विंगमॅनएक्स म्हणाले, “विंगमॅनएक्सची सुरुवात राइडर्सना योग्य राइडिंग साथीदार शोधण्यात मदत करण्याच्या साध्या कल्पनेतून झाली. कालांतराने ते विश्वास, जबाबदारी आणि समुदायभावनेवर उभे असलेले एक व्यापक परिसंस्था बनले. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स हे अशा राइडर्सचा सन्मान करण्याचे आमचे माध्यम आहे, जे रोज या मूल्यांनुसार जगतात आणि कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा ना करता, भारताची मोटरसायकलिंग संस्कृती घडवतात.” याच भावनेला दुजोरा देताना उर्वशी पाटोले, पार्टनर – कम्युनिटी आणि मार्केटिंग म्हणाल्या, “राइडिंग विश्वात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सातत्य, शिस्त आणि उत्कटतेचा हा सन्मान आहे. मोटरसायकलिंग संस्कृती सतत विकसित होत असते आणि विंगमॅनएक्स अवॉर्ड्स दरवर्षी वाढत जाण्यासाठी सुरू केले गेले आहेत. हे पुरस्कार राइडर्सना केवळ त्यांनी किती अंतर प्रवास केला यासाठी नव्हे, तर त्यांनी समुदायाला कसे उंचावले यासाठी सन्मानित करतात.” डॉ. साहिल त्रिंबके, सह-संस्थापक, विंगमॅनएक्स यांनी पुढे सांगितले, “मोटरसायकलिंग म्हणजे केवळ राइडिंग कौशल्य नाही; ते निर्णयक्षमता, जबाबदारी आणि रस्त्यावर एकमेकांची काळजी घेण्याची भावना आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स अशा राइडर्स आणि समुदायांचा सन्मान करतात, जे आपल्या कृतीतून ही मूल्ये स्थापित करतात, केवळ कामगिरीतून नव्हे. या मूल्यांचा सार्वजनिक गौरव करून आम्ही देशभरात अधिक सुरक्षित आणि जबाबदार राइडिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा ठेवतो.” या पुरस्कारांच्या केंद्रस्थानी आहे विंगमॅनएक्स अॅप – राइडर्सनी राइडर्ससाठी तयार केलेले भारतातील अग्रगण्य कम्युनिटी-टेक व्यासपीठ. भारतातील विखुरलेल्या राइडिंग विश्वाला एक सुसंगत डिजिटल आधार देणारे हे अॅप राइड ट्रॅकिंग, क्लब मॅनेजमेंट, सुरक्षा वैशिष्ट्ये, सत्यापित राइडर प्रोफाइल्स आणि समुदाय शोध अशा सुविधा पुरवते. अलीकडेच यात राइडर बॅजेस, राइडदरम्यान लाईव्ह ग्रुप लोकेशन ट्रॅकिंग आणि पीअर-आधारित राइडर रेटिंग्स ही नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे जबाबदारीची भावना अधिक बळकट होते. 80,000 हून अधिक अॅप डाउनलोड्स आणि 500 पेक्षा जास्त राइडिंग क्लब्स आधीच सक्रिय असलेल्या विंगमॅनएक्स प्लॅटफॉर्मवर, भारतीय मोटरसायकलस्वार कसे जोडले जातात, कसे राइड करतात आणि एकत्र कसे प्रगती करतात याची व्याख्या सतत नव्याने केली जात आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 हे वार्षिक उपक्रम म्हणून संकल्पित असून, येत्या काळात भारतीय मोटरसायकलस्वारांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी सन्मान मंच ठरण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. विंगमॅनएक्स विषयी: विंगमॅनएक्स हे भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक परिसंस्था आहे, जे तंत्रज्ञान, समुदाय आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, जबाबदार आणि परस्पर जोडलेली राइडिंग संस्कृती घडवण्यावर लक्ष केंद्रित करते. हे ॲप गूगल प्ले आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर...

उपमहापौर परशुराम वाडेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी

पुणे : पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी...

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी १४१४ तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६: विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देत...