गुरुग्राम, ४ जानेवारी २०२४ – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची जागतिक विमानसेवा कंपनी १ मार्च २०२४ पासून मुंबई ते भुज मार्गावर सेवा देण्यासाठी सज्ज आहे. एयर इंडियातर्फे स्थानिक नागरिकांतर्फे बऱ्याच काळापासून केली जात असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी या दोन शहरांदरम्यान सोयीस्कर व आरामदायी विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
A320 प्रकारचे सिंगल आयल विमान, AI 601 मुंबईतून 0705 वाजता निघेल आणि 0820 वाजता भुजमध्ये पोहोचेल. परतीचे विमान AI602 भुजमधून 0855 वाजता निघेल आणि मुंबईत 1010 वाजता पोहोचेल.
नवी सेवा इंग्लंड, उत्तर अमेरिका तसेच दुबई आणि सिंगापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर आंतरराष्ट्रीय कनेक्शन मिळवून देईल. त्याचबरोबर देशांतर्गत क्षेत्रातील २० ठिकाणी ते जोडलेले असेल.
या विमानसेवेचे आरक्षण सर्व माध्यमांतून सुरू झालेले असून त्यात एयर इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि प्रवासी एजंट तसेच ऑनलाइन प्रवासी एजंट यांचा समावेश आहे.