‘भारतीय भाषेतील रामकथा’ व ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथाचे प्रकाशन

Date:

पुणे : ” संविधानात राम, श्री राम जय राम जय जय राम हे आधुनिक युगात रामचा खरा अर्थ सांगणारे वाक्य आहे. प्रत्येकाच्या जीवनात आरंभा पासून ते अंतापर्यंत श्री राम रूजलेला आहे. राम हेच जीवनाचे विश्व आहे. या नावातच मोठी महिमा आणि गोडवा आहे.” असे विचार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या विद्यमाने ख्यातनाम लेखक, गांधी जीवन साहित्य व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘भारतीय भाषेतील रामकथा’ आणि ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे हे सन्माननीय विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच लेखक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
विजय बाविस्कर म्हणाले,”आधुनिक काळात लहान मुलांच्या जीवनावर होणार्‍या दुष्पपरिणामाकडे पाहता यावर भाष्य करणार्‍या रामाचे नवे स्वरूप पुढे आहे. नुकतेच रामनवमीच्या निमित्ताने लहान मुलांच्या चुमने रामाचा अर्थ सांगतांना असे मांडले की अभ्यासात जो रमतो राम, ग्राउंडवर जो गाळतो घाम श्रीराम जय राम जय जय राम… पत्रकार हा समाजाचा घटक असल्याने त्यांनी आधुनिक युगात सकारात्मक पत्रकारिता करावी.”
“संपादक, पत्रकार यांना धावपळिच्या युगात बोलावून मनःशांतीचे धडे दिल्यास निश्चितच समाजात खूप मोठे बदल घडतील. ९० पुस्तकांची निर्मिती करणारे लेखक विश्वास पाटील यांनी आता महात्मा गांधी आणि राम यावर नव्या पुस्तकाचे लेखन करावे असे ही विजय बाविस्कर यांनी सांगितले. ”
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” भारतीय संस्कृतीचे खरे तत्वज्ञान आणि परंपरेचे मूर्तीमंत प्रतिक श्री राम आहे. राम हा मार्यादा पुरूषोत्तम व एक वचनी आहे. मानव कल्याणासाठी रामाच्या जीवनाने जी चौकट आखली आहे ते सर्वोत्तम आहे. येणार्‍या काळात भारतीय तत्वज्ञान जगला दिशा देण्याचे कार्य करेल. यातूनच विश्वशांती निर्माण होईल.”
अरूण खोरे म्हणाले,” वर्तमान काळात आजच्या राजकर्त्यांंच्या अंतःकरणात खरा राम जागृत होने गरजेचे आहे. परंपरेतील सत्व तसेच ठेऊन नवे विचार काढले पाहिजे. पुस्तकाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा चांगला विचार समोर आला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने राम, गांधीजी आणि विनोबा हे एक सूत्र आहे हे समझले. प्रत्येकाच्या आयुष्यात रामाचे सत्व सापडायला हवे. भारतीय भाषेतील रामकथा, तुलसी रामायणाची भूमिका लेखकानी वेगळ्या प्रकारे मांडली आहे.”
प्राचार्य डॉ. विश्वास पाटील म्हणाले,” राम हे वैश्विक संस्कृतीचे रूप आहे. वाल्मिकी, कालिदास आणि तुलशीदास यांनी रामायण सांगितले. तसेच राम आणि कृष्ण हे जगाच्या संदर्भात पुजनीय आहेत. अहिल्याचा उद्धार झाल्यावर रामराज्याची स्थापना गंगेच्या काठेवर झाली. तसेच राम कथेची पहिली श्रोता ही जगदंबा आहे.”
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.
डॉ. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निलवर्ण यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपच्या माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती

मुंबईभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी...

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...

देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन काँग्रेस...