मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. भैय्याजी जोशींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेमधून संवाद साधला. आव्हाड यांनी विधानभवन परिसरात भाजप नेते प्रविण दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलता त्यांना टोला लगावला आहे. दरेकर भाई केम छो तमे, सारू छो ना? असा सवाल विचारत आव्हाड यांनी दरेकरांना डिवचले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील गुजराती भाषेतून सुरुवात केली.मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असे नाही. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले होते. त्यांच्या या विधानावर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून भैय्याजी जोशी यांच्यासह सरकारवर टीका केली जात आहे.जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केम छो भाई, सारो छे ना असे म्हणत सुरुवात केली. यावरून पत्रकारांनी त्यांना विचारले असता, आता मराठी नाही बोलायचे, असे आव्हाड म्हणाले. आता मराठी नाही, तर केम छो, ढोकला, फाफडा, जलेबी आता आपल्याला मराठी बटाटा वडा, वडापाव नाही बोलायचे. आता मुंबईत राहायचे असेल, तर गुजराती बोलायचे. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण गुजराती ही आता घाटकोपरची भाषा झाली. ती कालांतराने मुलुंटची भाषा होईल. त्यानंतर दहिसर आणि अंधेरीची भाषा होईल. मराठी फक्त दादरची भाषा मराठी राहील. म्हणजे आपण फक्त दादरपुरते मर्यादीत राहणार. मराठी माणसांना जागे केल्याबद्दल थँक्यू भैय्याजी जोशी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आता मुंबईत राहायचे असेल, तर गुजराती बोलायचे? केम छो भाई तमे, सारू छो ना?:आव्हाडांचा सरकारला टोला
Date: