पुणे -बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांनी केलेल्या पोलीस कारवाई मुळे वाटेतूनच माघारी पुण्यामध्ये परतला असून बँकॉकसाठी ते चार्टर विमानाने निघाले होते. मात्र आता हे विमान पुणे पोलिसांच्या कारवाई मुळे विशाखापट्टणहुन पुन्हा माघारी पुणे विमानतळावर दाखल झाले आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी टू वे चार्टर्ड फ्लाईट साठी जवळपास 1कोटी 68 लाख रुपये खर्च केल्याचे समजते.पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले की आम्हाला तक्रार मिळाली होती की ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाले आहे, ते बेपत्ता झाले आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही तपास चालू केला होता. मात्र, पुढील चौकशीमध्ये ते बँकॉकला निघाले असल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार मग आम्ही वैमानिकाला संपर्क साधून अर्ध्या रस्त्यातूनच ते विमान पुन्हा पुण्यामध्ये बोलावण्यात आले.या प्रकरणावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले, पहाटे उठून त्याने अभिषेक देखील केला होता. त्यानंतर तो सकाळी आवरून कॅम्पससाठी निघाला होता. पण त्याची हे अचानक टूर ठरली याबद्दल मला माहीत नव्हते. तो नेमका कशासाठी गेला होता हे भेटल्यानंतर कळेल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम ऍक्टिव्हेट झाली . त्यानंतर तातडीने यांची माहिती मिळवणे सुरू झाली आहे. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेले असे समजले आणि फ्लाईट आता कोणत्या देशाने चालले आहे याबाबत कन्फर्मेशन मिळवणे सुरू केले. तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा लागली . या संदर्भात किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आली .तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा नेमका बँकॉकला कशासाठी जात होता याची चौकशी अद्याप सुरू आहे. आता तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप परतला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले असेही वृत्त होते. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले गेले.त्यामुळे पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला .
तानाजी सावंत यावर बोलताना म्हणाले होते, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमकं माहित नाही. त्याच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला. तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. फोन केल्याशिवाय तो कुठे जात नाही, मात्र आज तसे झाले नाही म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच याबद्दल मला माहिती आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत मुलाचे अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 मिनिटांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आली. पोलिस या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले गेले . तसेच या प्रकरणी कथित अपहरण झालेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजही तपासले गेले.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2025/02/1000692821-771x1024.jpg)