लोकशाहीचे रक्षण करणार्या सर्व संस्थांवर भाजपाचा कब्जा
नागपुरात काँग्रेसचा 139 व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्यामध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.
नागपूर – आपण फक्त इंग्रजांच्या विरोधात लढा नाही दिला तर जुन्या जुलमी राजेशाही विरोधातही कॉंग्रेसने आणि इथल्या जनतेने लढा दिला आहे हे आपण विसरता कामा नये स्वातंत्र्याच्या आधी जर तुम्ही या देशात आले असता, तर तेव्हा इथे ५००-६०० राजे होते, इंग्रज होते.अनेक राजे इंग्रजांचे परतणार बनले होते . भारतीय जनतेला कुठलाच अधिकार नव्हता. गरीबाची जमीन जर राजाला चांगली वाटली, तर एका सेकंदात तो राजा ती जमीन घेऊ शकत होता. या सगळ्या अधिकारांचं रक्षण राज्यघटना करते. आंबेडकरांनी, गांधीजींनी, नेहरूंनी मेहनतीनं ती बनवली. ती काँग्रेस पक्षानं दिली आहे. आरएसएसचे लोक याच्या विरोधात होते. आज राष्ट्रध्वजाच्या समोर उभं राहून हे सलाम ठोकतात. पण कित्येक वर्षं यांनी तिरंग्याला सलाम नव्हता केला”, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आज आपल्या भाषणातून लक्ष्य केलं.देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदा घडली. पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला एक मत देण्यात आलं. तो दलित असो, आदिवासी असो, महिला असो, कुठल्याही भागातला असो. प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेनं एक मत दिलं. हे काँग्रेस पक्षानं केलं. गांधीजी तुरुंगात गेले. नेहरू तुरुंगात गेले. आंबेडकरांनी कित्येक वर्षं संघर्ष केला. हे काँग्रेस पक्षानं, आंबेडकरांनी, सगळ्यांनी मिळून केलं आहे”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. “जर तुम्ही इथे स्वातंत्र्यापूर्वी आले असते, तर तेव्हा भारतातील जनतेला कोणतेच अधिकार नव्हते. महिलांना अधिकार नव्हते. दलितांना कुणी स्पर्श करत नव्हतं. ही आरएसएसची विचारसरणी आहे. हे आम्ही बदललं आहे. पुन्हा एकदा हे भारताला त्याच काळात घेऊन जात आहेत”, असंही त्यांनी नमूद केलं.
भाजप तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, इंडिया आघाडीच तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते. देशातील मिडीयावर दबाव आहे. सर्व संस्था भाजपच्या ताब्यात असून त्यांच्या आधारे भाजपकडून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयक्त केला आहे, असा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.दरम्यान राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजप सरकार आल्यापासून त्यांच्या काही मित्रांना केवळ फायदा होत आहे. मोजक्या लोकांच्या हातात देशातील संपत्ती जात आहे. मी याविरोधात संसदेत प्रश्न उपस्थित केला तर भाजपचे लोक शांत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांमध्ये किती रोजगार दिले असा सवाल उपस्थित केला आहे. तर आम्ही सत्तेत आलो तर देशात जातीनिहाय जनगणना करु असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले आहे.राहुल गांधी म्हणाले की, राज्याच्या राजकारणात असो की प्रशासनामध्ये दलित, ओबीसी आणि आदिवासी लोकांना कुठेच संधी दिली जात नाही. ज्यां कंपन्यांना फायदा होत आहे. या कंपन्यांमध्ये दलित, ओबीसी कुठे आहे. देशात जातीय जनगणना केली पाहिजे. तर देशातील दीड लाख तरुणांना सैन्य दलात घेण्यात आले होते, त्यांना मोदी सरकारने अग्नीवीर योजना लागू करत सैन्य दलात येऊ दिले नाही. तरुण सांगत असतात की सरकारने आमचे जीवन खराब केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात गरिबी हीच एकमेव जात असल्याचा दावा करतात. असे असेल तर ते स्वतःची ओळख ओबीसी म्हणून का करून देतात? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना केला.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना करणार असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.
तरुणांच्या हाताला रोजगार नाही
राहुल गांधी म्हणाले की, देशातील करोडो युवकांच्या हाताला काम नाही, त्यांची शक्ती वाया जात आहे. तो बेरोजगार असल्याने सोशल मिडीयावर जास्त वेळ देत आहे. देशातील तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर हे सरकार हल्ले करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
भाजपमध्ये गुलामी सुरू
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचे अनेक खासदार हे काँग्रेसमध्ये होते. यातील एक खासदार मला भेटले ते मला म्हणाले की राहुल गांधी आपल्यासोबत चर्चा करायची आहे. मी त्यांना विचारले सगळे काही ठीक आहे ना? तर भाजपचे खासदार म्हणाले की, भाजपमध्ये राहणे आम्हाला सहन होत नाहीये. आम्ही भाजपमध्ये असलो तरी आमचे मन मात्र काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमध्ये येण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे. भाजपमध्ये गुलामी चालते, हायकमांड जे सांगते ते ऐकावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही, पहिले जसे राजा ऑर्डर देत होते तसेच आम्हाला भाजपमध्ये रहावे लागते. ते पटो वा न पटो त्यांचे सर्व ऐकावे लागते.
राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला दोन देश नको आहेत, ज्यांत एक श्रीमंताचा आणि मिडीया वाल्याचा आणि दुसरा गरीब लोकांचा असा वेगळा आम्हाला नको. तरुणांना रोजगार हवा आहे तो भाजप देऊ शकत नाही, रोजगार केवळ इंडिया आघाडीच देऊ शकते. नफरत कै बाजार मै मोहबब्त की दुकान हमने खोली है, हम सबको साथ लेकर चलना चाहते है असे म्हणत राहुल गांधींनी सर्वांना सोबत घेत सत्ता स्थापन करु असे म्हटले आहे.
- देशातील लोकांना असे वाटते की देशात राजकीय आणि सत्तेची लढाई आहे. पण ही विचाराची लढाई आहे. ही अनेक पक्षांची लढाई असली तरी दोन विचारधारांची लढाई आहे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकार आल्यापासून त्यांच्या काही मित्रांना केवळ फायदा होत आहे. मोजक्या लोकांच्या हातात देशातील संपत्ती जात आहे. मी याविरोधात संसदेत प्रश्न उपस्थित केला तर भाजपचे लोक शांत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांमध्येकिती रोजगार दिले असा सवाल उपस्थित केला आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, देशात जर गरीब हीच एक जात आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी कसे झाले असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी जर आमची सत्ता आली तर जातीय जनगणना करु असे जाही केले आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला दोन देश नको आहेत, ज्यांत एक श्रीमंताचा आणि मिडीया वाल्याचा आणि दुसरा गरीब लोकांचा असा वेगळा आम्हाला नको. तरुणांना रोजगार हवा आहे तो भाजप देऊ शकत नाही, रोजगार केवळ इंडिया आघाडीच देऊ शकते. नफरत कै बाजार मै मोहबब्त की दुकान हमने खोली है, हम सबको साथ लेकर चलना चाहते है असे म्हणत राहुल गांधींनी सर्वांना सोबत घेत सत्ता स्थापन करु असे म्हटले आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, राज्याच्या राजकारणात असो की प्रशासनामध्ये दलित, ओबीसी आणि आदिवासी लोकांना कुठेच संधी दिली जात नाही. ज्यां कंपन्यांना फायदा होत आहे, या कंपन्यांमध्ये दलित, ओबीसी कुठे आहे. देशात जातीय जनगणना केली पाहिजे.
- राहुल गांधी म्हणाले की, देशातील दीड लाख तरुणांना सैन्य दलात घेण्यात आले होते, त्यांना मोदी सरकारने अग्नीवीर योजना लागू करत सैन्य दलात येऊ दिले नाही. तरुण सांगत असतात की सरकारने आमचे जीपन खराब केले आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, देशातील करोडो युवकांच्या हाताला काम नाही, त्यांची शक्ती वाया जात आहे. तो बेरोजगार असल्याने सोशल मिडीयावर जास्त वेळ देत आहे. देशातील तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर हे सरकार हल्ले करतंय असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, भाजपकडून ईडी, सीबीआय अशा संस्थाचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाताे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व संस्थावर भाजपचा कब्जा आहे. भाजपने देशासाठी काय केले हे सांगावे असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, देशहितासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. भाजपवाले त्या जुन्या काळात जनतेला आणि देशाला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत. आमचे चुकले तर आमचे कार्यक्रते थेट आमच्याशी बोलतात.
- राहुल गांधी म्हणाले की, नेहरु, गांधीजी हे अनेकदा जेलमध्ये गेले. देशावर जनतेचे नियंत्रण असायला हवे, मागील काळात जसे राजा देश चालवत होता तसे पुन्हा होऊ नये. सामान्य माणसांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी लढाई लढली. तेव्हा राजा महाराजा हे इंग्रजासोबत भागीदारीमध्ये होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसची लढाई होती.
- राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमुळे देशामध्ये गरीबांना आणि मध्यमवर्गीय लोकांना घटना मिळाली, याला त्याकाळी रास्व संघाचा विरोध होता. घटनेमुळे सर्वासामान्य नागरिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळाले आहेत.
- राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमध्ये छोटा कार्यकर्ताही प्रयन विचारु शकतो, भाजपमध्ये गुलामी सुरू असल्याचे त्यांच्या खासदारांनी सांगितले.
- नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आणि मोदींना ते आवडले नाही म्हणून त्यांना भाजपमधून दूर करण्यात आले असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.
- राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचे अनेक खासदार हे काँग्रेसमध्ये होते. यातील एक खासदार मला भेटले ते मला म्हणाले की राहुल गांधी आपल्यासोबत चर्चा करायची आहे. मी त्यांना विचारले सगळे काही ठीक आहे ना? तर भाजपचे खासदार म्हणाले की, भाजपमध्ये राहणे आम्हाला सहन होत नाहीये. आम्ही भाजपमध्ये असलो तरी आमचे मन मात्र काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमध्ये येण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे. भाजपमध्ये गुलामी चालते, हायकमांड जे सांगते ते ऐकावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही, पहिले जसे राजा ऑर्डर देत होते तसेच आम्हाला भाजपमध्ये रहावे लागते. ते पटो वा न पटो त्यांचे सर्व ऐकावे लागते.
- 1920 मध्ये इंग्रज सरकारच्या विरोतज गांधीजींनी असहकार धोरणाला सुरूवात केली. या जमीनीतून इंग्रजाच्या विरोधात महात्मा गांधींनी चले जावची भूमिका ह्याच भुमीतून मांडली होती – नाना पटोले
- इंदिरा काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि जनता राजवटीला पराभूत करुन त्यांनी करिश्मा दाखवला. नागपूर-विदर्भाने काँग्रेसला पुन्हा हात दिला. नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हा ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघातूनतून निवडून गेले होते आणि आन्ध्रातून पराभूत झाले होते – नाना पटोले
- तानाशहा सरकारविरोधात आम्ही नागपुरातून आम्ही तैयार झाले आहोत. आम्ही कामगारांच्या साठी त्यांच्यासोबत उभे राहणार आहोत. जाती पातीचे भांडण लावणाऱ्याच्या विरोधात राहुल गांधींना आपल्याला साथ द्यायची आहे, असे आवाहन नाना पटोलेंनी उपस्थितांना केले आहे.