भगिनींच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’

Date:

पुणे: “देशभरात महिला अत्याचाराच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्य व राष्ट्रीय महिला आयोग, कौटुंबिक न्यायालयात लाखो तक्रारी प्रलंबित आहेत. ५०-६० टक्के तक्रारी कौटुंबिक वादाच्या असून, या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने देशभर ‘महिला आयोग आपल्या दारी’ अभियान हाती घेतले आहे. विभागवार सुनावण्या घेऊन या तक्रारींचे निराकरण केले जात आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. दिव्यांगांप्रमाणे ‘अभया’लाही सन्मान देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन रहाटकर यांनी दिले. 

वंचित विकास व उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभया अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. लोहगाव येथील नीहार आनंदनिवासमध्ये आयोजित परिषदेत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, रंजना चव्हाण, आणि उदयकाळ फाउंडेशनचे बाळकृष्ण बागुल, मयूर बागुल आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकल महिलांवर काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
विजया रहाटकर म्हणाल्या, “भारतीय कुटुंबपद्धती समाजव्यवस्थेचा आदर्श होता. मात्र, अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबपद्धतीने समाजात अस्थिरता वाढली आहे. महिला एकाकी पडत आहेत. महिला घरदार सांभाळून घेत असते. मात्र, तिच्यावर वेळ येते, तेव्हा परिस्थिती, जवळची माणसे कठोर होतात. असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. मान, सन्मान व स्वतःच्या हक्कांसाठी झगडावे लागते. महिला सन्मान व संरक्षणासाठी कायदे आहेत. तरीही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत. समाज म्हणून आपण भान जपायला हवे. मनातून आणि डोक्यातून एकल महिला ही कल्पना काढून टाकली आणि त्यांना अभय संबोधले, त्यांना आपल्यात सामावून घेतले, तर त्यांचे एकाकीपण दूर होण्यास निश्चित मदत होईल.”
“अभया ही सक्षम असते, तिला आधाराची, सकारात्मक मानसिकता देण्याची गरज असते. प्रेम, स्नेह व आपलेपणा तिला या संघर्षात ऊर्जादायी ठरतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची भूमिका ही ‘कॅटॅलीस्ट’सारखी आहे. समाजाचा स्वीकार आणि सकारात्मक भावना विकसित करण्यात संस्थांनी पुढाकार घ्यावा. महिला आयोग म्हणून अभयाच्या समग्र विकासासाठी काही शिफारशींवर आमचे काम सुरु आहे. येत्या काळात या शिफारसी केंद्र सरकारकडे देऊ. तसेच ही चळवळ देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जाण्यात महिला आयोग पुढाकार घेईल,” असा शब्द विजया रहाटकर यांनी दिला.
प्रास्ताविकात मीना कुर्लेकर म्हणाल्या, “नरेंद्र मोदी सरकारचे धोरण स्त्रियांना सन्मान देणारे आहे. त्यांचे सक्षमीकरण करणारे आहे. एकल महिलांच्या प्रश्नाची गंभीरता महिला आयोगाच्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी. अभया ही चळवळ देशपातळीवर घेऊन जाण्यात विजयाताई पुढाकार घेतील, असा विश्वास वाटतो.”
एकल महिलांचे प्रश्न व सामाजिक संस्थेची जबाबदारी, तसेच कामात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी परिषदेमध्ये विविध चर्चासत्रे आयोजिली होती. आर्थिक साक्षरतेवर स्वाती दुधाले, एकल महिलांचे भावनिक व मानसिक व्यवस्थापनावर डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजना व सामाजिक संस्थांना संधी याविषयीची माहिती शासकीय प्रतिनिधींनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...