एक दुर्मिळ स्कल बेस ट्यूमर काढण्यासाठी शहरातील सर्जन्सनी केली आठ तासांची शस्त्रक्रिया

Date:

 63-वर्षीय रुग्णाला श्रवणशक्ती परत मिळवून दिली

·         ज्युपिटर हॉस्पिटल येथील अनुभवी ENT सर्जन्सनी केलेल्या या प्रक्रियेत चेहऱ्याच्या मज्जातंतूंसह महत्त्वाच्या संरचना जपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विच्छेदन करणे आवश्यक होते

पुणे,एका अत्यंत आव्हानात्मक ENT शस्त्रक्रियेच्या प्रकरणात शहरातील अत्यंत अनुभवी सर्जन्सनी 8 तासांची अत्यंत गुंतगुंतीची शस्त्रक्रिया करून एक दुर्मिळ स्कल बेस ट्यूमर काढला आणि एका 63 वर्षीय रुग्णाची श्रवणशक्ती त्याला परत मिळवून दिली. हा रुग्ण पल्सेटाइल टिनायटसने पीडित होता, ज्यामध्ये कानात निरंतर एक आवाज येतो, जो नाडीच्या ठोक्यांशी जुळणारा असतो; तसेच कानात जड-जड वाटते. कानात वाजणाऱ्या या ठोक्यांमुळे रुग्णाची स्थिती शस्त्रक्रियेपूर्वी अत्यंत क्लेशदायक होती.

अशी आरोग्य स्थिती असलेल्या रुग्णाला ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. MRI आणि CT स्कॅनमध्ये दिसून आले की, त्याच्या जग्युलर फोरामेनमध्ये 4.5 सेंमी आकाराचा एक दुर्मिळ ट्यूमर होता, जो कानाच्या मध्यापासून मानेच्या वरील भागापर्यंत पसरला होता. त्या ट्यूमरचे आकारमान आणि स्थान पाहता, हे प्रकरण ज्युपिटर हॉस्पिटलमधील अत्यंत कुशल ENT सर्जन्सकडे पाठवणियात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. (क) इंदरदीप सिंह यांनी केली, तर डॉ. दुष्यंत खेडीकर यांनी त्यांना साहाय्य केले. या प्रक्रियेत चेहऱ्याच्या मज्जातंतूंसह महत्त्वाच्या संरचना जपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विच्छेदन करणे आवश्यक होते तसेच ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकणे देखील तितकेच महत्त्वाचे होते. विस्तारित हायपोटिम्पेनम दृष्टिकोनासह चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या वर आणि खालील बाह्य बोनी कॅनल हटविण्यात आली.

हे शस्त्रक्रियेचे प्रकरण आव्हानात्मक आणि तितकेच आगळेवेगळेही होते, मूलतः ट्यूमरच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे आणि त्याच्या नाजुक स्थानामुळे.

या प्रकरणाच्या जटिलतेची पुष्टी करत डॉ. (कर्नल) इंदरदीप सिंह म्हणाले, “जग्युलर फोरामेनमध्ये वाढलेला हा ट्यूमर कानाच्या मध्यापासून मानेच्या खालील भागापर्यंत पसरला होता. त्यामुळे त्याच्या शस्त्रक्रियेसाठी बारकाईने आयोजन आणि अंमलबजावणी दोन्ही आवश्यक होते. या भागात क्रॅनियल नसा आणि प्रमुख रक्तवाहिन्यांसहित महत्त्वाच्या रचना गच्च भरलेल्या असतात. हा ट्यूमर चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या आणि 12 व्या क्रॅनियल नसेच्या अत्यंत जवळ असल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान नसांना नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. शिवाय, ट्यूमरमध्येही खूप रक्तवाहिन्या असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव होण्याचा मोठा धोका होता त्यामुळे या समस्त प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव व्यवस्थापन ही एक चिंतेची बाब होती.”

या प्रक्रियेसाठी विविध शाखांच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. ENT सर्जन्सनी शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. काही अनपेक्षित गुंतागुंत उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी एक कार्डिओथोरॅसिस व्हास्क्युलर सर्जन होता. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमने दुहेरी दृष्टिकोन अंगिकारला. ट्यूमरपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तो काढून टाकण्यासाठी एकाचवेळी कानाच्या मध्यातून आणि मास्टॉइडमधून विच्छेदन केले.

या शस्त्रक्रियेतील वेगळेपण त्यात करण्यात आलेल्या टेकनिक्सच्या नावीन्यपूर्ण वापरात होते, ज्याच्यामुळे रक्त देण्याची गरज न पडता ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकता आला.

डॉ. सिंह म्हणाले, “रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी आम्ही ट्यूमर कॅप्सूलसह मायक्रो  बायपोलर कॉटरीचा उपयोग केला. शिवाय, प्रक्रियेदरम्यान आम्ही आंतरिक जग्युलर नस आणि सिग्मॉईड साइनस बंद केले, ज्यामुळे रक्तस्राव आणखीन कमी झाला.”

ते पुढे म्हणाले, “या शस्त्रक्रियेचा एक अत्यंत समाधानकारक परिणाम हा होता की कानात ठोक्यांचा आवाज येणे आणि कान जड वाटणे यांसारखी रुग्णाची लक्षणे तत्काळ अदृश्य झाली. ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकताना आम्ही रुग्णाची श्रवणशक्ती वाचवू शकलो याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो.”

या प्रकरणातून नेमकेपणा आणि टीमवर्क यांचे महत्त्व अधोरेखित झाले. महत्त्वाच्या संरचनांना धक्का न लावता, गुंतागुंत टाळून सर्जन्सनी कोणतीही न्यूरोलॉजिकल हानी होऊ न देता उत्कृष्ट परिणाम साधले. रुग्णाला त्याची श्रवणशक्ती परत मिळाल्याबद्दल त्या रुग्णाच्या कुटुंबियांनी ENT सर्जन्स आणि ज्युपिटर हॉस्पिटल, पुण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...