धर्माला द्वेषाचा पाया नसावा

Date:

बाबा भारती यांचे विचार मौलिक : डॉ. श्रीपाल सबनीस
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ‌‘समग्र बाबा भारती‌’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मनिरपेक्ष परंपरा जोपासण्याचे कार्य बाबा भारती यांनी पुढे नेले आहे. धर्माला द्वेषाचा पाया नसावा हा महान विचार बाबा भारती यांनी मांडला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. धर्मनिरपेक्ष विद्वानाच्या भूमिकेतून कर्मठवाद टिकत नाही तर लोककल्याणाचा धर्म टिकतो ही भूमिका बाबा भारती यांनी मांडल्याचे गौरवपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले.

पालि-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ‌‘समग्र बाबा भारती‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 2) झाले. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिदषेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, ज्येष्ठ बौद्ध विचारवंत दि. वा. बागुल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पगारिया, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. भीमराव गायकवाड, अनिल सोनवणे, डॉ. संभाजी मलघे, रजनी उद्धव कानडे मंचावर होते. प्रास्ताविकात महेंद्र भारती यांनी पुस्तक निर्मितीविषयी माहिती सांगितली. महेंद्र भारती, उद्धव कानडे, डॉ. संभाजी मलघे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
बौद्ध धर्माची मांडणी भारती यांनी सोप्या सुलभ मराठी भाषेत जनसामन्यांपर्यंत पोहोचविली आहे, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, बाबा भारती यांचे राष्ट्रभान व धर्मभान पक्के होते त्यातून त्यांनी अनेक धर्मांची तुलना केली. विविध धर्मातील दोष मांडले. गांधी-आंबेडकर वादही मांडला. परंतु भारती यांना विश्वभान महत्त्वाचे वाटल्याने धार्मिक अतिरेक विश्वाच्या एकात्मतेला मारक असल्याचा विचारही त्यांनी मांडला आहे. धर्माची दारे खुली करून भारती यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वडिलांची वैचारिक पुण्याई पुढील पिढीपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल सबनीस यांनी महेंद्र भारती यांचे अभिनंद केले.

दि. वा. बागुल म्हणाले, बाबा भारती यांचे साहित्य मोलाचे असून बुद्धांच्या वंदना मराठी भाषेत आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. धम्म सुरस आणि सोप्या मराठीत आणण्यात बाबा भारती यांचा मोलाचा वाटा आहे.

अशोक पगारिया म्हणाले, बाबा भारती यांचे साहित्य, मौलिक विचार समाजासमोर आणण्याचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे.

लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. भीमराव गायकवाड, बाबा कांबळे, आनंदा कांबळे, सूर्यकांत तिवडे, राजकुमार कांबळे, शंकर कांबळे, विक्रांत कांबळे, प्रकाश परांजपे, भाऊसाहेब कांबळे, सचिन कांबळे, विजय कांबळे, सुरेश देशमुख, प्रकाश कांबळे, सतिश केकनीस यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी सूर्यकांत तिवडे, शंकर कांबळे, आनंदा कांबळे, सतिश केकनीस यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्याशी पुरुषोत्तम सदाफुले यांनी संवाद साधला.
मान्यवरांचे स्वागत निमिष भारती यांनी केले. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी तर आभार डॉ. संभाजी मलघे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related