राज ठाकरेंनी अजित पवारांवर बोलू नये, ते उठ दुपारी अन् घे सुपारीवाले नाहीत; NCP चा मनसेवर पलटवार

Date:

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवारांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांची स्थिती गझनीच्या हिरोसारखी झाली आहे. त्यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण ते उठ दुपारी आणि घे सुपारी वाले नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील यशावर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा केवळ 1 खासदार निवडून आला होता. त्यानंतर चारच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 42 आमदार निवडून आले. हे कसे घडले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे ते म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण व आनंद परांजपे यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला. अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या घरात दारुण पराभव झालेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. राज ठाकरे यांना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराभव का झाला? यावर बोलावे. अजित पवारांसारखे पहाटे 6 वा. उठून काम करावे, असे ते राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणालेत.

सुरज चव्हाण म्हणाले, राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण, ते उठ दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत. राज ठाकरेंची स्थिती गझनी चित्रपटातील हिरोसारखी झाली आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी भाषणाला येताना आपण 2009, 2014, 2019 व 2024 साली काय विधाने केली ते तपासून पहावे. ते त्यांना पुढील काळात भाषण करताना उपयोगी ठरेल. गझनीसारखे लगेच विसरण्यापेक्षा त्यांच्या लक्षात राहील.

अजित पवार पहाटे 6 वाजेपासून लोकांची कामे करतात. लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे मार्गी लावतात. राज ठाकरे यांच्यासारखे दुपारी उठायचे व सुपारी घेऊन बोलायचे असे ते करत नाहीत. मनसेच्या आमदाराला त्याच्याच गावात केवळ 1 मत पडले. कदाचित तो एकच व्यक्ती त्या आमदाराने केलेल्या कामाचा लाभार्थी असेल. लोकांची कामे न करणारे निवडून कसे येतील? असेही ते यावेळी राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणाले.

एनसीपीचे नेते आनंद परांजपे यांनीही या प्रकरणी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज याची भूमिका कायमच बदलणारी राहिली आहे. त्यांचा पक्ष ऋतुसारखा आपली भूमिका बदलो. त्यांनी आपला पक्ष व चिन्ह राहिल की नाही याची चिंता करावी. त्यांना 128 जागा लढवून केवळ 1.55 टक्के मते मिळाली. त्यामुळे त्यांनी आमच्यावर बोलण्यापक्षा स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील जनतेलाही मनसे व राज ठाकरे यांच्यावर भरवसा राहिला नाही. परिणामी, विधानसभेत त्यांचा एकही प्रतिनिधी राहिला नाही.

मनसेच्या उमेदवारांना तेथील निकालावर विश्वास नव्हता तर राज ठाकरे आजवर गप्प का राहिले? त्यांनी 3 महिन्यांनंतर याविषयी संशय व्यक्त केला. त्यामुळे त्याला आता फारसा अर्थ राहिला नाही. राज ठाकरे यांचीही यापूर्वी ईडी चौकशी लागली होती. त्यामुळेच तर त्यांची भूमिका बदलली नाही ना? असे म्हणण्यास वाव आहे, असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...