पुणे:“ कोविड १९ मुळे जगभरातील अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत चांगले ध्येय धोरण आखून अर्थव्यवस्था स्थिर करणे गरजेचे आहे. अशावेळेस मागणीवर आधारित मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनेल.” असे मत माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी मांडले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या पाचव्या सत्रात ‘ द इंडियन इकॉनॉमी बियॉन्ड द ब्लेम गेम’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी व सीईओ अश्विन कुमार चौहान, ओडिसाच्य कटक येथील आमदार सौविक बिस्वाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
यशवंत सिन्हा म्हणाले,“ कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थिक स्थितीला स्थिर करू शकेल. त्यामुळे यावर सर्वाधिक भर देणे गरजेचे आहे. तसेच लोकांच्या गरजेनुसार मागणी वाढवावी. त्यात घर, हाऊसिंग प्रकल्प, हायवे आणि रस्त्ये यात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सर्व सामान्य व्यक्ती हा पेट्रोलियची वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजचे आहे.”
“कोविडमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरिता रोजगाराचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन योजना आखून अमलात आणाव्यात. मनरेगा, रोहयो सारखे प्रकल्प राबवून ग्रामिण व शहरी भागात रोजगार निर्माण करून ग्राहकांच्या खिशात पैसा आणावा. ग्राहकाकडे अधिक पैसा असेल तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देऊ शकेल. त्यामुळे देशाच्या आर्थिक सुधारणेत वृद्धि होईल.”
अश्विन कुमार चौहान म्हणाले,“ भविष्य हे तंत्रज्ञानावर आधारित आहेत. देशाच्या वेल्थमध्ये सुधार आणण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असणार आहे. तंत्रज्ञान हे नवनवीन वेल्थ निर्माण करीत आहे तसेच मानवाला परिवर्तन करीत आहेत. औद्योगिकीकरणामुळे परिवर्तनाची सुरूवात झाली. आजच्या काळात वेल्थ निर्मितीमध्ये स्पेस ट्रॅव्हल्स, कृषी क्षेत्र, ऑनलाइन सारख्या अनेक गोष्टी आल्या आहेत. भारत हा युवकांचा देश असून दुसरीकडे चीन व जपान सारखे प्रगत देश वृद्धत्वाकडे चालले आहे. त्यामुळे येथील युवकांनी वेल्थ निर्मितीसाठी नव तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. पुढील काही काळात देशाची आर्थिक स्थिती १०० ट्रिलियन डॉलरची होईल. भौगोलिक राजकारणामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, भारत हे प्रगत आहे. तंत्रज्ञान, लोकसंख्याशास्त्र आणि भौगोलिक राजकारण या तीन सर्वात महत्वाच्या गोष्टी असून त्याचा स्विकार करणे गरजचे आहे.”
सौविक बिस्वाल म्हणाले,“ देशाची आर्थिक स्थितीत सुधार आणण्यासाठी सेंद्रीय शेती म्हणजेच कृषी क्षेत्राला अधिक प्रगत करणे गरजेचे आहे. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने युवकांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू करावे. सध्या देशात आरोग्य सेवेची समस्या मोठ्या प्रमाणात असून त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ”
विद्यार्थी प्रतिनिधी इशा पेंडसे, रितिका सिंग, कौशल पांडे आणि आनंद सिंग यांनी विचार मांडले.
प्रा.डॉ. सुब्बाराव यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयराज यांनी आभार मानले.