पुणे- सारे पक्ष जनतेला सारखेच वाटतात , एक ना धड भराभर चिंध्या असे आपण नेहमीच म्हणतो , कोणीही निवडून आले वा सत्तेत आले तर आपल्याला काय फरक पडणार आहे ? महागाई कमी होणार आहे काय ? जीवन जगणे सुसह्य कोण करणार आहे काय ? आपला संघर्ष आपल्याला करावाच लागणार आहे कोणताही पक्ष सत्तेत येऊ द्यात आपल्या संघर्षाचे दिवस काही बदलत नाहीत किंवा छोटा मोठा दिलासा कोणी देत नाहीत सारेच स्वप्न दाखवून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर .. असा जनप्रवाह कित्येक वर्षे या राज्यात आणि देशात आहे तसाच आहे अगदी याच पार्श्वभूमीवर पण तरीही .. नेमके काय अवघड कधी होऊ शकते हे सांगणारी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली आहे .. त्यांनी नेमके काय म्हटले आहे ते वाचा …..
सत्तेतल्या आणि विरोधातल्या कोणत्याच पक्षाबद्दल प्रेम नाही पण शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष संपले तर मुंबई एकतर गुजरातची राजधानी होईल किंवा केंद्रशासित प्रदेश. म्हणून आत्ता वैचारिक विरोध असला तरी त्यांच्या पाठीशी उभं राहणं भाग आहे.सेनेनं राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवणं चुकलेलंच आहे हेही खरं असलं तरी मुंबईवर काय परिणाम होईल याचा विचार करावा लागतो.
-विश्वंभर चौधरी