पुणे- स्वतंत्र आरक्षण ,अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न ,राज्यपाल नियुक्त विधानपरिषद अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरु करणे, लहूजी वस्ताद साळवे स्मारक उभारणे या सारख्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने आज येथे सर्वपक्षीय राज्यव्यापी ‘यल्गार’ चा इशारा दिला आहे. राज्यस्तरीय मातंग समाज पक्ष ,संघटना प्रमुखांची बैठक आज पुण्यातील हॉटेल ओर्बीट येथे घेण्यात आली . या बैठकीला राज्यातील सुमारे ३० विविध पक्ष आणि संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .आज या समाजात खूपच गंभीर परिस्थिती आहे. नौकऱ्या मध्ये समाज सर्वात कमी आहे. आरक्षणाचा फायदा मिळू न शकणारा समाज अशी ओळख या समाजाची होते आहे. त्यासाठी अ ब क ड वर्गीकरण करून आरक्षण मिळावे , विधानसभा अस्तित्वात आल्यापासून या समाजाला राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्व देण्यात आलेले नाही. त्या पासून कायम डावलण्यात आले . या शिवाय मुंबई ,पुणे येथील स्मारकाचे प्रश्न रखडलेले आहेत लहूजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी अद्याप अंमलात आणल्या गेल्या नाहीत . अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांवर यावेळी चर्चा केली गेली. केवळ कोरोना या महामारी मुळे सध्या यावर जागृतीचे काम राज्यभर करून, या मागण्यांसाठी जानेवारीत हा समाज रस्त्यावर एल्गार स्वरूपात आपला आक्रोश व्यक्त करेल असा इशारा येथे सर्व नेत्यांनी दिला . मातंग समाजाचे नेते रमेश बागवे , तसेच दलित महासंघाचे मच्छिंद्र सकते, रिपब्लिकन नेते हनुमंत साठे, माजी आमदार राजीव आवळे, राम गुंडीले,प्रा. मिलिंद आव्हाड ,शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, तसेच सुकुमार कांबळे ,अनिल हातगळे ,विजय , मनोज कांबळे, नगरसेवक अविनाश बागवे,इचलकरंजी चे नगरसेवक अब्राहम आवळे ,सुरेश पाटोळे ,संदीपन झोंबाडे ,काशिनाथ आल्हाट ,शिवाजीराव राजगुरू, विठ्ठल थोरात औरंगाबादचे संजय ठोकळ आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेत एल्गार ची घोषणा केली .