वाचकाला आपल्या विचारप्रवाहात सोबत नेणे महत्वाचे ! :डॉ विद्या येरवडेकर
‘ऑफ स्वान्स अँड सॉंग्ज ‘ कथासंग्रहाचे प्रकाशन
पुणे :’लेखन करताना सोपे इंग्रजी लिहिणे हेच अवघड असते .सोप्या इंग्रजीत इंग्रजी कथा लिहून वाचकांना त्यात आपल्या विचारप्रवाहात सोबत घेऊन जाणे ,हे लेखकाच्या दृष्टीने अतिशय कौशल्याचे काम आहे ‘,असे मत ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ विद्या येरवडेकर यांनी काढले .
रोहिणी परांजपे-साठे लिखित आणि’नोशनप्रेस’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘ऑफ स्वान्स अँड सॉंग्ज ‘ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ विद्या येरवडेकर आणि ज्येष्ठ गायन गुरु माधुरी जोशी हस्ते झाले . तेव्हा डॉ येरवडेकर बोलत होत्या. हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पीवायसी जिमखाना येथे झाला .रोहिणी परांजपे -साठे यांचा हा पहिलाच इंग्रजी कथासंग्रह आहे . सभागृहात डॉ शां ब मुजुमदार ,दिलीप प्रभावळकर,डॉ गो ब देगलूरकर ,डॉ शिरीष साठे ,डॉ प्रसाद राजहंस इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
डॉ येरवडेकर म्हणाल्या’पुस्तक लिहिणे हेच अवघड आणि कष्टाचे काम आहे .कारण प्रत्येक शब्द लिहिताना अनेकदा विचार करावा लागतो . लेखन करताना सोपे इंग्रजी लिहिणे हेच अवघड असते .सोप्या इंग्रजीत इंग्रजी कथा लिहून वाचकांना त्यात आपल्या विचारप्रवाहात सोबत घेऊन जाणे ,हे लेखकाच्या दृष्टीने अतिशय कौशल्याचे काम आहे . या कामात लेखिका रोहिणी परांजपे -साठे यशस्वी झाल्या आहेत ‘,
डॉ विद्या येरवडेकर पुढे म्हणाल्या ,’लेखनाची आवड असणे आणि आपल्या आवडीच्या गोष्टींना न्याय देता येणे हेही धैर्याचे काम आहे . आवड पुस्तकरूपाने पूर्ण होणे यात रोहिणी परांजपे साठे यशस्वी झाल्या आहेत . हे लेखन उत्तम दर्जाचे असून भविष्यात त्या इंग्रजीतील देशातील अव्वल लेखिका म्हणून उदयास येतील . ‘माधुरी जोशी यांनीही छोटेखानी भाषणातून शुभेच्छा दिल्या .
मूळच्या गायिका आणि अर्थतज्ज्ञ असलेल्या लेखिका रोहिणी परांजपे -साठे म्हणाल्या ,’लेखन हे एक प्रकारचे खुळावलेपण आहे . गायन आणि लेखन या दोन्ही प्रक्रिया सारख्याच अभिव्यक्तीच्या आणि ताकदीच्या आहेत . गाताना स्वरांचे सामर्थ्य जाणवावे तसे लिहिता लिहिताच मला शब्दांचे सामर्थ्य जाणवत गेले.ज्यांच्या जगण्याची कुठे दखल घेतली गेलेली नाही अशा अनेक व्यक्तिरेखांच्या जीवनातील कथा माझ्या हातून लिहिल्या गेल्या .
लीला रविचंद्रन यांनी सूत्रसंचालन केले