आपत्तीकाळात ५ हजार कुटुंबांपर्यंत रास्त दारात भाजीपाला पोहचविण्याचा -नगरसेविका अश्विनी कदम यांचा संकल्प
पुणे-लॉकडाऊनमधील आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी नगरसेविका अश्विनी कदम यांच्या पुढाकाराने व सकारात्मक प्रयत्नांतून प्रभाग क्रमांक ३५ मध्ये लोकांच्या मागणीनुसार कोरोना संदर्भातली सर्व काळजी घेऊन नागरिकांसाठी स्वस्त आणि रास्त दरामध्ये अर्थात फक्त रु. १०/- मध्ये कोणताही भाजीपाला घरा च्या दारात उपलब्ध करून देण्यात आला.
जेणेकरून रस्त्यावरील गर्दी टाळून नागरिक या कोरोनाच्या संकटापासून दूर राहतील याची स्वतःची काळजी घेतील व नागरिकांनी या उपक्रमास स्वतःची व जनतेची काळजी घेत भरपूर उदंड असा प्रतिसाद दिला.
“सध्या भाजीवाले भाज्यांचे स्वतःच्या मनाप्रमाणे भाव लावून नागरिकांची लूट करीत आहेत आणि अशा परिस्थितीत नितीन व अश्र्विनिताईंनी खरोखर योग्य पाऊल उचलत समाधान प्राप्त करून दिले आहे…” असे उदगार तावरे कॉलनी, अरण्येश्वर येथील लोकांनीव्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्तकेले.