मुंबई, ठाणे औरंगाबाद मध्ये कर माफी मग पुण्यालाच काय प्रॉब्लेम आहे ?
अश्विनी कदम यांचा स्थायी समिती अध्यक्ष ,महापौर आणि आयुक्तांना थेट सवाल
पुणे- ५०० चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मुंबई , ठाणे येथे मिळकत कर माफी देण्यात आली आहे आणि त्यांनतर आता औरंगाबाद मध्येही हि प्रक्रिया सुरु झाली आहे अशा स्थितीत, कोरोनाच्या महामारीत देखील ज्या पुण्याने महापालिकेला बक्कळ उत्पन्न मिळवून दिले त्या पुणे महापालिकेचा काय प्रॉब्लेम आहे असा थेट सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी नितीन कदम यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांना केला आहे. आणि स्वतः पुढे येऊन पुण्यातही ५०० फुट आकाराच्या घरांना करमाफी द्यावी असा प्रस्ताव सादर केला आहे . आता बहुमताच्या जोराव हा प्रस्ताव फेटाळनार काय ? असाही सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई मनपाने पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करून सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर पुणे मनपाने सुद्धा शहरातील पाचशे स्क्वेअर फिट पर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करून सवलत द्यावी या आशयाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दिला आहे.राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अश्विनी कदम (नगरसेविका) व लक्ष्मी ताई दुधाने (नगरसेविका) यांच्या वतीने सदरचा प्रस्ताव देण्यात आला आहे. २४ तास पाणी पुरवठा करतो असे सांगत लोकांच्या कडून मागील पाच वर्षांमध्ये पुणे मनपाने मिळकत करांमध्ये व पाणीपट्टी मध्ये दुपटीपेक्षा जास्तीने वाढ करून वसुलही केली आहे आहे .. एकीकडे अपुऱ्या नागरी सुविधा, वाढता भ्रष्टाचार व या मिळकत करीत करांच्या वसुलीसाठी अवलंबलेली सावकारी पद्धत यातून सर्वसामान्य पुणेकर धास्तावलेला आहे. अशा परिस्थितीत सदरचा प्रस्ताव मान्य करून पुणे मनपाने नागरिकांना दिलासा द्यावा हीच मागणी आहे.असे अश्विनी नितीन कदम यांनी म्हटले आहे.