बावनकुळे जादूटोणा वर विश्वास ठेवणारे, अंधश्रद्धा पाळणारे त्यांच्यावर मी बोलणार नाही
पुणे-खोट्या केसेस ,आरोप करून कुटुंबे उध्वस्त करण्याचे प्रकार होऊ नयेत अशी विनंती आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे,खडकवासला मतदार संघातील वाहतूक कोंडी आणि नागरीसुविधा बाबतच्या समस्यांनी उग्र रूप धारण केले असून याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी महापालिकेतील बैठकीसाठी त्या आल्या असत्या पत्रकारांनी विचारलेल्या प्र्शान्नाची उत्तरे देताना त्या म्हणाल्या ,’माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ नये. त्यांचे काम चांगले असून त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देऊ नये. त्यांनी लढाई लढली पाहिजे असे नाराज झाले नाही पाहिजे.’सत्यमेव जयते’ महत्वाचे असून सत्याचा विजय होईल.संबंधित व्हिडिओ मी पाहिला असून याबाबत कोणता अनुचित प्रकार घडलेला नाही.राज्यातील राजकारण खालच्या स्तरावर जाणे वेदनादायी आहे.अशा घटनांमुळे राजकारणातील महिलांचे नुकसान होते अशी भावना त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना विनंती आहे की, खोट्या केसेस कोणावरही दाखल केल्या जाऊ नये. भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही कारण ते जादुटोणावर विश्वास ठेवणारे असून आम्ही अंधश्रद्धा विरोधी आहे. ते काही बोलत असतात त्याकडे मी गांभीर्याने पाहत नाही. विनयभंग हा खोटा गुन्हा आव्हाड यांच्यावर दाखल असून त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः फोटो फ्रेम मध्ये आहे. खोटे आरोपामुळे कुटुंब उध्वस्त होतात. आव्हाड यांनी चित्रपट गृहात कोणास मारहाण केली नाही. त्यांना चौकशीस बोलावून पोलिसांनी अटक केली आणि जाणीवपूर्वक दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकास आहे परंतु इतिहासावर आधारित चित्रपट करताना काल्पनिक गोष्टी टाकू नये. जी लढाई झाली नाही ती दाखवून चुकीचा इतिहास दाखवणे चुकीचे आहे.
दमानियांच्या भूमिकेबद्दल आभार
आव्हाड यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी महिलांची योग्य भूमिका मांडल्याने मी त्यांची आभारी आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीस राजकारणात घेऊन कौटुंबिक पातळीवरील राजकारण करणे हे गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. हे थांबण्याची जबाबदारी सत्ताधारी यांची आहे. महिलांना शिवीगाळ करणे, पोलीस ठाण्यात पिस्तूल घेऊन जाणे, मंत्रालयात अधिकारांना शिवीगाळ करणे असे प्रकार ‘ ईडी’ सरकार करत असून प्रलोभन आणि दडपशाहीवर त्यांचे सरकार चालू आहे.