पुणे- रेल्वेच्या डब्यांमधील रुग्णांसाठी केलेली व्यवस्था गेली कुठे ? बालेवाडीतील रुग्णांच्या व्यवस्थेचे गाडे कुठे अडले ? शेखर गायकवाड सारखे महाराष्ट्रीयन अधिकारी हटवून राव आणि कुमारांनी कोणते दिवे लावलेत ? असे अनेक प्रश्न आता मनसेच्या वर्तुळात उपस्थित होत असताना आज माणसे चे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी कमला नेहरू रुग्णालयातील सर्व सुविधा धूळ खात पडून असताना तिथे आय सी यु कक्ष का सुरु करत नाहीत असा सवाल उपस्थित करत .. बऱ्या बोलानं ..आरोग्य सुविधा सर्वांना पुरवा, हवी तर सारी खाजगी रुगानालये देखील ताब्यात घ्या .. पण आरोग्य सुविधेवाचून कुणाला वंचित ठेवू नका ..अन्यथा .. रस्त्यावर गाठून हाणू असा इशारा आज स्पष्टपणे दिला आहे .
ते म्हणाले ,’पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ICU व व्हेंटिलेटर , ऑक्सिजन बेड ची सुविधा काही महिन्या पूर्वी तयार करण्यात आली आहे परंतु स्थानिक लोकप्रतींनिधीच्या हट्टा मुळे सदर विभाग अजूनही सुरू करण्यात आला नाही असे निदर्शनास आले आहे . इतका खर्च करून उभारलेले ICU आशा पद्धतीने धूळ खात पडून रहाणे वाईट आहे पुणे शहरात करोना रुग्ण व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मृत्यू मुखी पडत असताना प्रशासन ही हा विभाग सुरू करण्या साठी प्रयत्नशील नसावा हे पुणेकराचे दुर्देव आहे प्रशासनाला दोष यासाठी कारण सत्ताधारी पक्ष हा फक्त अर्थकरणा भवती फिरणार्या सुविधा उभ्या करण्यास मग्न आहे. रुग्ण जगो अथवा मरो …
सध्या कोरोना च्या या बिकट काळात नागरिकांना ICU व ऑक्सिजन बेड मिळत नसताना योग्य ते सोपस्कार पार पाडत त्वरित कमला नेहरू रुग्णालया मधील ICU व व्हेंटिलेटर , ऑक्सिजन बेड ची सुविधा सुरू करावी. अन्यथा मनसे २४ तासात सदर विभाग ताब्यात घेऊन icu सुरू करेल याची नोंद घ्यावी. असे त्यांनी म्हटले आहे.
आज icu उपलब्ध नाही icu अभावी रुग्ण मरत आहेत काही उपाय योजना कराव्यात जेणे करून कमला नेहरू तील साध्य चालू असलेले विभाग डिस्टब होणार नाही अथवा वरील ठिकाणचे उपचार कमला नेहरूला वर्ग कराव्यात उदा राजीव गांधी वगैरे तर त्याच बरोबर खाजगी परंतु बंद अवस्थेत असलेले हरजीवन ,दीनदयाळ सारखे व काही प्रमाणात टिळक आयुर्वेदिक,आष्टागं, ताराचंद,बिबबेवाडीच esi च हॉस्पिटल अशी काही प्राथमिक नावं पण आहेत जिथे कोविड रुग्णालये त्वरित सुरू करता येतील
प्रशासनाने उपाय योजना तर केल्या पाहिजे हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकणारे विभाग कसे वाढतील या बाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी ठरवून कार्यवाही करत नाही असं मनसे च म्हणणं आहे.चालू व्यवस्था बंद करा आणि आम्ही सुचवू तेच करा हे आमचं म्हणणं नाही
म्हणणं साधं आहे हॉस्पिटल आहेत ती ताब्यात घ्या त्यामुळे टाळू वरच लोणी कमी खायला मिळेल …पण उपचारा अभावी तडफडून मारणारे जीव तर वाचतील खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत हि ते म्हणाले , महापालिकेने हि सारी रुग्णालये ताब्यात घ्यावीत आणि तिथूनही सुविधा पुरवाव्यात कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत हि मनसे ची भूमिका आहे त्या जर मिळाल्या नाहीत तर ..यांना रस्त्यावर हाणू .. हि वेळ आमच्यावर येवू देवू नका .हा शेवटचा इशारा समजा असे ते म्हणाले.