पुणे- सोमाटणे ;तळेगाव दाभाडे येथील टोल वसुली बेकायदा असल्याचा आरोप करत ती बंद करण्यासाठी सुरु झालेले ७ जणांचे उपोषण आणि आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी रात्री साडेबारा वाजता उपोषण कर्त्या नेत्यांशी चर्चा केली असे विधान सभेत सांगितल्यावरही प्रत्यक्षात मात्र सोमाटणे येथे टोल विरोधी समितीने केलेल्या आवाहनानुसार आंदोल्न्स्थालावर मोठ्ठी गर्दी होत गेली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे धाव घेतली . यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण अधिवेशन झाल्यावर यावर आंदोलन कर्त्यांशी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले .तोवर येथील जनतेकडून त्यांच्या कार वर टोल वसुली करू नये असे सांगितल्याचे स्पष्ट केले . आणि मग सुरु झाला अन्य वाहनांचा प्रश्न जी माल वाहतूक करतात . हे आंदोलन सर्वपक्षीय होते . काहींनी पुन्हा तेच .. मागे हि हेच झाले म्हणत फसवले फसवले असा ओरडा मंत्र्याच्या तोंडावर सुरु केला. तेव्हा उपोषण करते नेते म्हणाले उपोषण सोडू कि मरु .. ते सांगा .. अखेरीस मंत्री चव्हाण यांची शिष्टाई कामी आली आणि उपोषण कर्त्या सात हि नेत्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले …
तत्पूर्वी …काय झाले, हे समजून घ्या …जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे- तळेगाव दाभाडे येथील टोल बंद करा, या मागणीसाठी मावळचे नागरिक एकवटले आहेत.त्यासाठी मावळवासीय रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे शनिवारपासून (11 मार्च) टोल हटाओ कृती समितीच्या पुढाकाराने मावळवासीय बेमुदत उपोषणात सहभागी झाले आहेत. एकीकडे हे उपोषण तर दुसरीकडे आज हे आंदोलन करत टोल नाक्यालगतच नागरिक एकत्र आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर हा टोल नाका आहे. सोमाटणे आणि वरसोली असे दोन टोल नाके 31 किलोमीटरच्या अंतरात आहेत. प्रत्यक्षात 60 किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा, असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2018 द्वारे अनिवार्य आहे. म्हणूनच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. 2006 मध्ये हा टोल नाका सुरु झाला असून 2019 मध्ये त्याची मुदत संपलेली आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शिवाय 800 कोटी वसूल करण्याची मुभा असताना प्रत्यक्षात अडीच हजार कोटी वसूल केल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. म्हणूनच सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने बेकायदेशीर सुरु असलेली वसुली बंद करावी, अशी मागणी घेऊन अनेकदा आंदोलन छेडली आहेत. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी या टोल नाक्यावरुन स्थानिकांना विनाटोल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र कालांतराने टोल आकारणाऱ्यांनी पुन्हा वसुली सुरु केली. त्यामुळेच आता पुन्हा एकदा सोमाटणे टोल हटाओ कृती समिती आक्रमक झाली आहे. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु केलं तर आज मावळवासीय थेट रस्त्यावर उतरले आहेत.