पुणे – सैनिका विषयी कृतज्ञता…तुमच्यासाठी घरोघरी विविध सण,उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की,उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो की,इतर सण अशा उत्सवांची ते आतुरतेने वाट पाहात असतात.म्हणून डॉ.नंदकिशोर एकबोटे आणि समृद्धी एकबोटे यांनी रक्षाबंधनानिमित्त पुणे शहरातील माता भगिनींनी,मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर,दीनदयाळ उपाध्याय पतपेढी, योग विद्या धाम संस्था,आधार मूक बधिर विद्यालय, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून सैनिको हो तुमच्यासाठी अशी भावना व्यक्त करतात.आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देत विद्यार्थ्यानी व सामाजिक संस्थांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक अशा 15 हजारांहून अधिक राख्या तयार करून शिवाजीनगर येथील पोस्टऑफिस मधून पाठवल्या.डॉ.नंदकिशोर एकबोटे म्हणाले की,आम्ही 26 जुलै हा विजय दिवस म्हणून साजरा केला.आणि रक्षाबंधन असो की, दिवाळी,अशा उत्सवांना सीमेवर देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी परत येऊ शकत नाही.त्यामुळे देशवासियांकडून त्यांना राख्या किंवा आपल्याकडील पत्र मिळाले की सैनिकांना खूप आनंद होत असतो.सैनिकांची अनेक पत्र मी जतन केले आहेत.केवळ एका संस्थेतर्फे हा कार्यक्रम साजरा होऊ नये.तर देशभर हा उपक्रम केला गेला पाहिजे. यातून सीमेवर असणाऱ्या बाहादूर सैनिकांचे मनोबल वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभावना निर्माण होते. पोस्ट सर्विसच्या माध्यमातून सीमेवरील सैनिकांपर्यंत या राख्या पोहचविल्या जाणार असल्याचे डॉ.एकबोटेनी सांगितले.माजी सुभेदार ज्ञानेश्वर शिंदे,मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगरचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.