१२ वर्षाच्या मुलीने लिहिले भविष्यातील पाणीटंचाईवर ‘स्टेटमेंट’ पुस्तक …
पुणे: पाणी टंचाई हा रोजचाच चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यात पाणी टंचाईसंदर्भात किती अडचणी निर्माण होऊ शकतात या विषयावर भाष्य करणारे काव्या खेमका हीने कल्पनेवर आधारीत ‘स्टेटमेंट’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे माननीय खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले.
काव्या केवळ १२ वर्षांची मुलगी असून सेंट मेरी स्कूल येथे शिक्षण घेत आहे. काव्या तिच्या दूरदृष्टीकोणातून प्रौढ लेखकाप्रमाणे पाणी टंचाईसारख्या जीवंत प्रश्नाकडे पाहते आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. वाचकाला वाचते करण्यासाठी तीने यामध्ये कल्पनाशक्ती खूप चांगल्यारीत्या वापर केला आहे. असे करत असताना या समस्येतील गांभीर्य, संवेदनशीलता आणि जीवंतपणा टिकवून ठेवला आहे.
हे पुस्तक कल्पनेवर आधारीत टाईम मशीनमधील ‘पाणी एक दुष्काळी युग २०९०’ मध्ये घेऊन जाते. यामध्ये गावातील समस्या, त्यावरील उपायांवर सांगण्यात आले आहे. या पुस्तकात समाजातील सध्याच्या परिस्थितीवर लिहिण्यात आले असून वाचक येत्या काळात निर्माण होणार्या समस्येचा अंदाज बांधू शकतात. या पुस्तकाच्या निमित्ताने १२ वर्षीय लेखिकेने निर्धार, आत्मविश्वास, साहस आदीच्या जोरावर तुम्ही तुमच्या ध्येयापर्य़ंत पोहोचू शकता हे दाखवून दिले आहे. काल्पनिक असले तरी संवेदनशील आणि मनोरंजक बनवले आहे.
एवढ्या लहान वयात पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाबरोबरच आणखी दोन कारणे असल्याचे काव्या सांगते. त्यातील एक म्हणजे, कुटुंबाबरोबर उन्हाळी सुट्टीसाठी बाहेर गावी जात असताना गावातील लोकांची होणारी पायपीट, वणवण लहान वयापासूनच पाहिली होती. जीवनाश्यक अशा पाण्याच्या एका थेंबासाठी दूरपर्यंतची भटकंती तिला सतावत होती. त्याबरोबरच येत्या काही वर्षांत निर्माण होणारी पाणी टंचाई यावर आधारीत जनजागृती करण्यासाठी शाळेत अनेक धडे दिले गेले. या दोन कारणातून ‘स्टेटमेंट’चा जन्म झाला आहे.
रहस्य, कल्पना, पात्रांची विशिष्ट रचना, सर्वात शेवटी देण्यात आलेला अभिप्राय यामुळे परिपूर्ण बनले असून सर्व वयोगटातील वाचकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.
हे पुस्तक यूएसएमधील प्रसिद्ध पेंग्विन रँडम हाऊस कंपनीद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. जवळपास १३ हजार आॅनलाइन वेबसाइट आणि अग्रगण्य पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे.
लेखिकेविषयी-
काव्याने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वाचणास तर वयाच्या सहाव्या वर्षापासून लघुकथा लिहिण्यास सुरूवात केली. त्यामुळे काव्या बाल लेखिका आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
काव्या म्हणते, या पुस्तकाच्या निमित्ताने मी जे करू शकत नव्हते ते करून दाखवले आहे आणि माझ्या स्वप्नांना एक दिशा मिळाली आहे. ती पुढे म्हणते, पुस्तक लिहिणे म्हणजे प्रकल्प नसून एक प्रवास आहे ज्यामध्ये रोमांच आहे आणि मी तो अनुभवला आहे.
पुस्तकाच्या माध्यमातून स्वप्न सत्यात उतरले असून जास्तीत जास्त लिहिण्याची इच्छा काव्याने व्यक्त केली.