रिक्षा चालकमालकांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, सर्व रिक्षा संघटनां ऐक झाल्या आहेत,पुणे येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत स्टॅन्ड प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाबा कांबळे यांचे रिक्षा चालकांना आवाहन.
पुणे- बेकायदेशीर टू व्हीलर बैईक व इतर विविध प्रश्नांमुळे, रिक्षा व्यवसाय संपुष्टात आला असून रिक्षा चालकांचे जगणं मुश्किल झाले आहे,यासाठी सर्वच रिक्षा संघटना आपापल्या परीने प्रयत्न करत असून सरकार दरबारी विविध मागणीसाठी आंदोलन केले आहे परंतु सरकारने आश्वासनाच्या पलीकडे कोणतेही प्रश्न सोडवले नाही,यामुळे आता पुणे शहरातील सर्व संघटना एक झाल्या असून रिक्षा चालक मालकाने देखील एकीचं बळ दाखवून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन 28 नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे आंदोलन यशस्वी करावे,आता नाही तर कधीच नाही हा आपल्या जीवन मरणाची लढाई आहे या लढाईमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे एकत्र आल्याशिवाय सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही आपले प्रश्न सुटणार नाहीत, असे महाराष्ट्र रिक्षा संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी कार्यालय व पुणे येथील मंगळवार पेठ येथील कार्यालयात रिक्षा स्टॅन्ड प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी बाबा कांबळे बोलत होते,
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कोर कमिटीचे विलास केमसे पाटील ,मोहम्मद भाई शेख,माझी अध्यक्ष शफिक भाई पटेल, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख संजय दौंडकर, रवींद्र लंके, तोफिक कुरेशी, किरण एरंडे, संजय शिंदे, अन्सार शेख, उपस्थित होते,
बाबा कांबळे म्हणाले रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून, रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे माझे त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे,
रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट व गंभीर होत आहे त्यांच्या प्रश्नांवरती एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे,
अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांना देखील आत्महत्या करावे लागेल यापूर्वी देखील आठ रिक्षा आत्महत्या केल्या आहेत कोविढ नंतर अनेक रिक्षालकांच्या रिक्षा ओढून नेल्या त्यांचे संसार उघड्यावरती आले आता ते हळूहळू आपला व्यवसाय करत आहेत परंतु एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत आहे,
मोठ्या भांडवलदार विरोधातील लढा,
हा लढा मोठे भांडवलदार यांच्या विरोधामध्ये आहे रिक्षा व सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलदार येत असून केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे त्यांच्या सोयीचे कायदे करत आहे, यातून पूर्वपार चालत आलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रिक्षासारखी व्यवस्था मेटाकुटीला आले असून त्यावर अवलंबून लाखो रिक्षा चालक मालकांचे संसार उध्वस्त होत आहेत,
ही लढाई खूप अवघड आहे परंतु सर्वजण एकत्र आल्यास ती अधिक सोपी होईल, रिक्षा संघटनेचे नेते केशव क्षीरसागर, अशोक साळेकर , आनंद तांबे, आनंद अंकुश,संजय कवडे, किशोर चिंतामनी हे सर्व मंडळी प्राणपणाने लढा, देत आहेत , रिक्षा चालकांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या पाठीशी रिक्षा चालक मालकांनी खंबीर पणे उभे राहावे असे आव्हान देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले