पुणे- तिसरी लाट थांबविण्यासाठी रस्त्यावरील व फुटपाथवरील भिकारी, फुगेवाले, भिंगरीवाले, रेल्वे स्टेशन व एस.टी स्टेशनवर राहणारे नागरिक यांचे त्वरित प्राधान्याने लसीकरण केले पाहिजे अशी ठाम भूमिका घेत तशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांनी केली आहे.
यासंदर्भात आबा बागुल म्हणाले कि,’ कोरोनाचा संसर्ग थांबविणेस लसीकरण हा मार्ग असून सध्या शहरात लसीकरण चालू आहे. परंतू रस्त्यावरील व फुटपाथवरील भिकारी, फुगेवाले, भिंगरीवाले व तत्सम यांचे लसीकरण होत नाही. हे नागरिकांच्या विविध कारणाने थेट संपर्कात येत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे. या नागरिकांचे अशिक्षितपणा असल्याने लसीकरणाला त्यांचेकडून महत्व दिले जात नाही तसेच त्यांचेकडून शासकीय कागदपत्रे नसल्याने देखील अडचण निर्माण होते. यावर मार्ग काढून तातडीने रस्त्यावरील व फुटपाथवरील भिकारी, फुगेवाले, भिंगरीवाले, रेल्वे स्टेशन व एस.टी स्टेशनवर राहणारे नागरिक यांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी आबा बागूलांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले कि,’ वास्तविक कोरोनाचा प्रवेश शहरात मार्च २०२० मध्ये झाला असून सदयस्थितीत तुलनेने रूग्ण कमी येत आहेत. लसीकरण देखील पुणे शहराची लोकसंख्या पाहता वेगाने होत नाही, अशा परिस्थितीत रस्त्यावरील व फुटपाथवरील भिकारी, फुगेवाले, भिंगरीवाले, रेल्वे स्टेशन व एस.टी स्टेशनवर राहणारे नागरिक यांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा लॉकडाऊन करणेची वेळ येवू शकते. यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
आबा बागूल असेही म्हणाले की, लसीकरण कार्यक्रम अत्यंत महवाचा असून याविषयी तातडीने धोरण ठरवून मार्ग काढून प्राधान्याने रस्त्यावरील व फुटपाथवरील भिकारी, फुगेवाले, भिंगरीवाले, रेल्वे स्टेशन व एस.टी स्टेशनवर राहणारे नागरिकांचे लसीकरण चालू करावे. तरच पुणे शहर कोरानामुक्त होवू शकते. अन्यथा रस्त्यावरील व फुटपाथवरील भिकारी, फुगेवाले, भिंगरीवाले, रेल्वे स्टेशन व एस.टी स्टेशनवर राहणारे नागरिक यांची संख्या पाहता त्यांचे लसीकरण न झाल्यास कोरोनाची तिसरी लाट गंभीररित्या येवू शकते.