पुणे – तळजाई वनक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रावर विविध विकासकामे करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली आहे. श्री. पवार यांनी या निधी देण्यासाठी तत्वतः मान्यता दिल्याचे आमदार मिसाळ यांनी कळविले आहे.
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘तळजाई येथील राखीव वनक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वनक्षेत्रामध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासाठी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याला त्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.’