पुणे : आंबेडकरी चळवळीतले नेते आरपीआय मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांचे आज (ता. १३) निधन झाले. त्यांच्यावर उद्या (१४) धनकवडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.त्यांच्या मागे मुलगा विरेन ,पत्नी सत्यभामा ,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
आरपीआय मध्ये ३० वर्षापासून कार्य करीत असताना दलीत समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे .लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले .दलीत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी साठे कायम लढा दिला. पुण्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या कामातून ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.