पुणे- साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाऊन ये मगच तुझ्याशी बोलतो ‘ असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला आलेल्या भिडे गुरुजी यांनी केल्याने महिला वर्गात खळबळ उडाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी,’ ते आता म्हातारं माणूस झालेले आहेत. ते’साठी बुद्धी नाठी’ म्हटलं तरी चालेल, अशा माणसांचे बाईटच घेऊ नयेत. हे महिलांना अपमान करत आहेत, पूर्वीची प्रथा ते परत आणू इच्छित आहेत. असे म्हटले आहे रुपाली पाटील म्हणाल्या, “मुळात बाईनं टिकली लावायची की नाही हा तिचा वैयक्तिक अधिकार आहे. ती कुठल्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही. कारण कुठल्या धर्मात जन्माला येताना धर्म मागून जन्माला येत नसतं. भिडे गुरुजींचं कुठे मनावर घेता…
“ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “संभाजी भिडे यांनी कोणत्या धर्माचं पालन करावं, कोणता धर्माची आचारसंहिता मानावी हा सर्वस्वी भिडे यांचा प्रश्न आहे. पण भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीन कलम १९ मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणं राहण्याचा, आचरण करण्याचा स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कुठलीही वेशभुषा करावी यावर इतर कोणी भाष्य करु नये. हा प्रकार निषेधार्ह आहे. याद्वारे तुम्ही एखाद्याच्या आचार स्वातंत्र्याचा घाला आहे”
भाजपचे आध्यात्मिक आघाडी समर्थन करणार नाही– तुषार भोसले
संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले म्हणाले, कुठल्याही धर्मात किंवा संस्कृतीत महिलांचा अनादर करणं हे बसत नाही. महिलांचा सन्मान करणं हीच आपली संस्कृती आहे. महिलांचा सन्मान केला जावा हीच आमची भूमिका आहे. पण ते कशामुळं असं बोलले हे मला सांगता येत नाही. त्यामुळं ते जे बोलले आहेत ते अयोग्य बोलले आहेत, त्यामुळं या गोष्टीचं आम्ही कदापी समर्थन करणार नाही.